अहा जिंदगी ,वाह जिंदगी

अहा जिंदगी ,वाह जिंदगी

किसी बात पर हार कर बैठ जाना
मुनासिब नहीं,पस्ते हिम्मत न हो तू
जब तब न था,न अब भी रहेगा,
यही जिंदगी का है बाकी फ़साना।
ना कोई साथ था….
ना कोई साथ होगा,
खुद की परछाई का
भी यूँ वही हाल होगा,
मुश्किल का सूरज
जो सिर पर चढेगा…
खुद की परछाई भी
तब ख़ुदग़र्ज़ बनकर
क़ाफूर हो जाती है अक्सर..
थामी थी पतवार  तूने
तब भी खुद के भरोसे,
अब वही कर फिर से,
तू खुद के ही भरोसे…..
क्योंकि,
ग़र तूफ़ां’ तुझ पे भारी पड़ा तो,
हिम्मत से सबका भरोसा उठेगा।
कमर कस के फिर से खड़ा हो,
मुझे दे ये हिम्मत ,सहारा मुझे दे
तू हार की भीख हर्गिज न लेगा।
किसी बात पर हार कर बैठ जाना
मुनासिब नहीं,पस्ते हिम्मत न हो तू।

अहा जिंदगी ,वाह जिंदगी,

रवीन्द्र परांजपे, rpparanjpe@gmail.com

पतझड

पतझड

झरती पंखुड़ियां यादों की,
पतझड,बसंत भी बीत रहा।
हर नया वर्ष , हर नया पर्व
बीते जीवन की साक्षी रहा।
समय रेल सा रुकता, चलता,
आवन,जावन का मेल रहा।
मोड़ पता कब हो अंतिम यह
भय,संशय का यह खेल रहा।
सूरज गोधूली में  डूब चला तब,
कल सूर्योदय का स्वप्न खिला।
झरती पंखुड़ियां यादों की,
पतझड,बसंत भी बीत रहा।
********************
क्यों बीत गया मेरा बचपन,
यौवन भी मृगजल खेल बना।
ढल चली शाम जब जीवन की,
तब स्वप्नों को क्यों करूं मना ?
यह जमा-खर्च की झोली जीवन पर इसका हिसाब पूरा कर लूँ,
तब उस पार चलन की सोचूंगा।
चप्पू तब खेने बैठूंगा,
हां, खुद ही खेने बैठूंगा।
*********************
रवीन्द्र परांजपे,
+९१९६४४०३२३२९
rpparanjpe@gmail.com

तात्या – माझे मोठे भाऊ          (भाग एक) 

तात्या – माझे मोठे भाऊ
          (भाग एक) 

            निरपेक्षपणे कोणाचे व्यक्तीचरित्र लिहिणे अतिशय अवघड काम आहे. पण तेच काम एका नात्याच्या दृष्टिकोनातून लिहायचे म्हटले तिथे मग बरेच सोपे होते, तसेच जर त्या व्यक्ती विषयी, तुमच्या संबंधात अतिशय जिव्हाळा व आपुलकी असेल तर मग विचार उमटवणे खूप सोपे होते. माझे मोठे भाऊ, तात्या गेल्या वर्षीच , तीन मे (2019) रोजी आमची 74 वर्षाची साथ सोडून ब्रह्मलीन झाले. 2013 साली सर्वात मोठी बहीण (सुशीला)ताई, नंतर गेल्या वर्षी प्रदीर्घ अशा आजारा नंतर, तात्या गेल्या मुळे एक मोठी पोकळी आल्या सारखे भासते.
            पूर्वी कुटुंबे बरीच मोठी असायची, बहुदा दोन किंवा तीन भावंडे, किंवा अधिक ही, असणे हे  फारसे वावगे समजले जात नसे. मी 1910 ते 1960 च्या काळातील गोष्टी करीत आहे.
             आता मी आम्हां भावंडां विषयी आणि विशेष करून तात्यां विषयी सांगण्या पूर्वी एकंदर परांजपे घराण्याची व आमच्या कुटुंबाची त्रोटक पण आवश्यक अशी माहिती प्रथम देतो. तात्यां ची माहिती तर मुख्यत्वे करून आहेच, पण काही आवश्यक अशी अवांतर माहिती, पुढच्या पिढ्यांना ज्ञात असावी म्हणून देत आहे, म्हणून हा लेख कदाचित अधिक लांब होईल अशी भीती आहे, तरी त्या बद्दल क्षमस्व.
      परांजपे हे चित्पावन ब्राह्मण, अर्थातच, मूळ कोकणचे राहणारे व सर्व परांजपे(परांजप्ये), देव, मंडलिक, किडमिडे, नेने व मेहेंदळे यांचे गोत्र विष्णुवृद्ध, वेद ऋग्वेद, सूत्र आश्वलायन, शाखा शाकल.तसेच विष्णुवृद्ध गोत्राचे आ॑गिरस, पौरुकुत्स्य, त्रासदस्यव, असे तीन प्रवर आहेत. मूळ सर्व परांजपे कोकणातील आडिवरे ह्या गावचे. आडिवरे येथील देव श्री लक्ष्मीनारायण आणि श्री महाकाली हे आमचे कुलदेवता आणि कुलदेवी होय.परांजपे घराण्याच्या एकंदर 102 शाखा आहेत. जसेजसे परांजपे यांचे मूळ पुरुष आडिवर्‍या होऊन इतर गावी स्थानांतरित होऊन तिथे स्थायिक झाले त्याप्रमाणे या शाखा तयार झाल्या.आमची 56 वी शाखा कोकणातील मुर्डी गावी स्थलांतरित झाली त्यामुळे आम्ही मुर्डीचे परांजपे म्हणविले जातो. चार पिढ्यां पूर्वी आमच्या खापर पणजोबाना मुर्डी  जवळ शेरवली या गावची बारा आणे वतनदारी मिळाली. त्या मुळे ते शेरवली येथे राहू लागले. पण वतनदारी गेल्या मुळे पुढच्या पिढ्या देशावर येऊन सांगली, सातारा या भागात वास्तव्य करून होत्या. या कारणाने तीन पिढ्यां पूर्वी पासून कोल्हापूरच्या करवीरवासिनी महालक्ष्मी अंबाबाई यांना आम्ही कुलदेवी मानतो.
              वरील माहिती मुख्य करून व्यक्तिचित्रात अशा दृष्टीने दिली आहे, कि तात्यां विषयी एक परांजपे म्हणून जाणून घेण्या पूर्वी परांजप्यांच्या मुर्डी शाखेतील नवव्या पिढीतील या व्यक्तीची पिढीजात पृष्ठभूमि कशी काय होती, हे माहीत असणे आवश्यक आहे.
        आम्ही एकंदर पाच भावंडे. माझे वडील ति.कै. पांडुरंग श्रीधर परांजपे व आई  कै.कमलाबाई परांजपे, हे दोघेही कोकणातून देशावर आलेले.पूर्वीचे बर्‍या पैकी सधन कुटुंबातील,पण दोघांचे ही वडील त्यांचा लहानपणीच गेल्या मुळे,इतर नातलगांनी जवळ जवळ सर्व मालमत्ता गिळंकृत केली. आमच्या वडिलांची आई सुद्धा लहानपणीच वारली, त्यामुळे ते आठ दहा वर्षाचे असल्यापासून त्यांना आपल्या मोठ्या भावाचाच आधार होता. आमचे मोठे चुलते श्री दत्तात्रय श्रीधर परांजपे, यांनी व्हर्नेक्युलर फायनल (७ वी बोर्ड) झाल्या नंतरच मुंबईत नोकरी धरली,व आपल्या धाकट्या भावाला, आमच्या वडिलाना, इलेक्ट्रिकल इंजिनियर केले. आमची आई व आजी आमच्या मामां जवळ राहिली. आईचे शिक्षण त्या काळचा रीतिप्रमाणे चौथी पाचवी पर्यंतच झाले. 1931 साली नोव्हेंबर महिन्यात, मुंबई मध्ये, अतिशय साधेपणाने त्यांचा विवाह झाला व तेव्हांच, आमची आई ‘गोदावरी’ बसून ‘कमला’ झाली.
         1933 साली त्यांचे पहिले अपत्य , म्हणजेच सुशीला हिचा जन्म इगतपुरी येथे झाला. सर्व भावंडात ती मोठी म्हणून तिला ‘ताई’ हे नाव 1935 साला पासून तिच्या बरोबर चिकटले ते कायमचेच, कारण याच वर्षी वसई येथे मंदाकिनी हिचा जन्म झाला, तिला आम्ही सर्व लहान भावंडे मंदाताई ह्या नावाने संबोधतो, आता ती 84 वर्षांची असून, आपल्या सासरी आपल्या पती श्रीयुत मधुकर राव कुलकर्णी यांच्या बरोबर, राजेंद्रनगर इंदूर येथे राहते.तिने सुशिला ताईंना प्रथम ‘ताई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली व ती तेव्हां पासून, अगदी आमच्या आई दादां पासून, सर्व जगाची ‘ताई’ झाली.
      आमचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते, आपल्या कामा मध्ये अतिशय निष्णात आणि प्रामाणिक होते. त्या वेळेस आजकाल सारखे प्रत्येक प्रांताचे एलेक्ट्रिसिटी बोर्ड नव्हते.त्या मुळे प्रत्येक शहरात प्रायवेट कंपन्यांची पॉवर हाऊसेस असायची.त्यांनी इगतपुरी,वसई,बर्‍हाणपूर,खंडवा व हरदा येथील पॉवर हाऊसेस बांधून सुरू केली.
         मामा, मामी गेल्या नंतर आमच्या आजी (ति.कै.यमुनाबाई लिमये) सुद्धा आमच्या बरोबरच रहात असत.पाठोपाठ दोन मुली झाल्या, मुळे जुन्या पिढीतील लोकां प्रमाणे त्यांचा ही मुलीं वर बराच राग असायचा.त्या मुळे
20 सेप्टेंबर 1937 ला जेव्हां हरदा येथे असताना अरुण (तात्यांचा) चा जन्म झाला , तेव्हां सहाजिकच सर्वात जास्त आनंद आजींना झाला. तात्यांचे बालपण आजींच्या कोडकौतुकात गेले.1943 पर्यंत हरद्या ला काम केल्या नंतर, दादांनी काही दिवस नागपूर येथे स्वतःचा उद्योग सुरु करायचा प्रयत्न केला.याच सुमारास दुसरे महायुद्ध चालू असल्या मुळे त्यांना ऑर्डिनेंस सर्विसेस मध्ये कटनी च्या ऑर्डनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी) मध्ये नोकरी लागली.त्यामुळे सर्व कुटुंब नागपूरहुन मध्यप्रांतातील कटणी ला शिफ्ट झाले. त्या वेळेस ताई व मंदाताई दोघीजणी प्रायमरी मध्ये शिकत होत्या.सुरुवातीला कटणी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये शाळा नव्हती, त्यामुळे छोट्या अरुणना पाच-सहा किलोमीटर लांब कटनी शहरात वेगळ्या शाळेत घालणे शक्य नव्हते. मंदाताई व ताई ज्या शाळेत जात असत, ती शाळा बार्डस्ले गर्ल्स स्कूल, ही जरी मुलींची शाळा होती, तरीही तिथे चौथी पर्यंत को-एज्युकेशन होते. त्यामुळे सहाजिकच, जवळजवळ चार वर्षें,ते त्या दोघीं बरोबरच बार्डस्ले गर्ल्स स्कूल मध्ये शिकले.1947 मध्ये जेव्हां ऑर्डनन्स फॅक्टरीची स्वत:ची शाळा सुरू झाली, तेव्हां ते तिथे शिकू लागले.1947 च्या शेवट पासून 1951 मध्ये काही दिवस, सातवीला पोहोचे पर्यंत, त्यांचे शिक्षण याच शाळेत झाले. 51 साली ते सातव्या वर्गात, कटणी (हिंदीतील नाव कटनी) शहरातील साधुराम हायस्कूल नावाच्या शाळेत दाखल झाले.वडिलांच्या नोकरीत एका जागेचे स्थैर्य नसल्याने, आम्हां पाची भावंडांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तरी, अनेक जागांवर वाटून, वेगवेगळे शाळां मधून झाले. 1951 सालाच्या शेवटी ही असेच झाले. दादांची तात्पुरती बदली (ट्रान्सफर) ऑर्डनन्स फॅक्टरी कटनी येथून सहा महिन्यां करिता ऑर्डनन्स फॅक्टरी खमरिया, जबलपूर येथे झाली. सुरवातीला (कारण कटणी चा क्वार्टर फॅक्टरी ने दादांच्या नावावर ठेवला होता.) दादा एकटेच त्यांच्या सरदार बलवंतसिंग गावाच्या शिख सहकाऱ्यासह खमरिया जबलपूरला गेले. त्या वेळेस दुसर्‍या महायुद्धा नंतर सर्व ऑर्डिनेंस ट्रॅक्टरांचे नविनीकरण सुरू होते, व सर्व फॅक्टरीज मध्ये डी.सी सप्लाय ऐवजी ए.सी सप्लाय ची पॉवर हाऊसेस (व त्या प्रमाणे सर्व मशिनरी सुद्धा) बदलण्याचे करण्याचे काम सुरू होते. दादा, माझे वडील या कामा मध्ये तज्ञ होते,त्यामुळे येथे या प्रकारचे कन्व्हर्शन सुरू असेल, तिथे त्यांची बदली होत असे. वर या बदलीला मी तात्पुरती या करता म्हटले आहे,कारण कटनी ऑर्डनन्स फॅक्टरी चे सुपरिंटेंडेंट (त्यावेळेस जनरल मॅनेजर ला सुपरिंटेंडेंट हा हुद्दा होता.) दादांना रिलीव करायला तयार नव्हते.
सुरुवातीला असा कयास होता की हे काम सहा एक महिन्यात पूर्ण होईल, पण परदेशातून पॉवर हाऊस ची मशिनरी यायला बरेच दिवस लागणार, असे दिसल्यावर आमची आई व चौघे भावंडे (चि. प्रकाशचा जन्म 1954 साली भुसावळला झाला.) खमरिया जबलपूर येथे शिफ्ट झालो. तात्पुरती व्यवस्था असल्यामुळे बलवंतसिंग अंकल आणि दादांना चार खोल्यांचा एक क्वार्टर देण्यात आला होता.बलवंतसिंग अंकल हे एकटेच राहत असल्यामुळे, तीन खोल्यांमध्ये आम्ही पांचजण, आणि एका खोलीमध्ये ते राहत असत. अर्थात त्यांचे जेवण खाण आमच्या बरोबरच होत असे.मिश्रित संस्कृतीचे अतिशय मजेदार दिवस होते ते. तात्या जबलपूरला प्रसिद्ध अशा मॉडेल हायस्कुल मध्ये जवळजवळ एक-दीड वर्ष शिकले. मी मात्र अजून शाळेत जात नव्हतो, त्यामुळे तात्या सकाळी सिटी बस ने शाळेत जाऊन दुपारी तीन वाजेस्तो परत येत,तो पर्यंत माझा वेळ जाता जात नसे.1952 साली, दिवाळीच्या सुमारास, जेव्हां दादांचे काम संपून ते कटणीला परत गेले, तेव्हां ते वर्ष पूर्ण करण्यासाठी आजी, ताई व तात्या हे तिघे, जबलपूरलाच, घमापुर येथे एक घर भाड्यावर घेऊन काही दिवस तिथेच राहिले. हे तिघे कटणी ला  येतात, तोपर्यंत दादांची प्रमोशनवर ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे बदली झाली.भुसावळला त्या वेळेस हिन्दी माध्यमाच्या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा नव्हत्या व तात्यांचे चौथ्या इयत्ते नंतर चे शिक्षण हिन्दी माध्यमातून झाले होते. त्या मुळे आठवी पास होई पर्यंत कटणीच्या साधुराम हायस्कूल मध्येच शिकले. पण त्या नंतर मात्र तात्यांना जबलपूर येथील महाकोशल हायस्कूल (महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूलची हिन्दी माध्यमाची शाखा होती)मध्ये घातले. तिथे होस्टेल ची ही सोय होती. परत मोठ्या तीन भावंडांची, कुटुंबा बरोबर, ताटातूट झाली. तात्या इयत्ता नववी करता महाकोशल हायस्कूल चा होस्टेल मध्ये राहिले. तसेच ताई व मंदाताईंची रवानगी सागर विद्यापीठात कॉलेज शिक्षणा करता झाली, सागर विद्यापीठाची स्थापना डॉक्टर सर हरीसिंह गौर या ख्यातनाम बॅरिस्टर आणि शिक्षणतज्ञांनी केली होती.तिथे मुलींच्या हॉस्टेल ची वेगळी उत्तम सोय होती.आता भुसावळ ला  फक्त मी, दादा आणि आई असे तिघे गेलो. मी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या शाळेत जाऊ लागलो. इकडे जबलपूरला मात्र तात्यांना महाकोशलच्या होस्टेल मध्ये बरेच खडतर दिवस कंठावे लागले. महाकोशल चे होस्टेल मागील बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर होते. शाळेतील शिक्षण जरी व्यवस्थित असले, तरी हॉस्टेल मधील मेस मध्ये जेवणाची अतिशय आबाळ होत असे. अतिशय लाडात वाढलेल्या तात्यांना घरी भरपूर सकस आहार मिळत असे. इथे मेस मध्ये खडे असलेला भात, करपलेल्या पोळ्या व पाण्या सारखे पातळ वरण आणि जहाल भाजी असायची. तसेच प्यायचे पाणी, अंघोळीचे पाणी, आपआपले
खालच्या मजल्या वरून बादल्या भरून वर घेऊन जावे लागायचे. तशात गरम पाण्याने आंघोळीची सोय अजिबात नव्हती. हे सर्व असताना तात्यांच्या सोशिकपणा ची कमाल पहा, कि घरी लिहिलेल्या पत्रांतून या अखंड खडतर जीवना विषयी एक चकार शब्द नसायचा. मला अजूनही आठवते आम्ही ज्या भाड्याच्या घरात राहत होतो, तो ‘थिओडोर व्हिला’ नावाचा बंगला,15 बंगले नावाच्या भागात, प्रोटेस्टंट चर्च समोर होता.तो एका रिटायर झालेल्या एलवारिस नावाच्या गोवानीज रिटायर्ड रेल्वे गार्डचा होता . हे आजोबा ख्रिश्चन होते. वय जवळ जवळ 75 वर्ष, बायको नाही, दोघा मुलींची लग्न झालेली. पण हा गृहस्थ, आपल्या गोवानीज डुमिंग नावाच्या नोकरा व टायगर नावाच्या कुत्र्या बरोबर मजेत राहायचा. खाण्या पिण्याचा (!!) अतिशय  शोकीन ! यांच्या घरी नाताळची मोठी पार्टी होती. तितक्यात रात्री ‘पी एस परांजपे, तुमचा टेलिग्राम आहे’ – असे पुकारत पोस्टमन हजर झाला.त्या दिवसांमध्ये फोन इतके बोकाळले नव्हते, खरे तर अजिबातच नव्हते.त्यामुळे टेलिग्राम म्हटले की सर्वांच्या छातीत धस्स व्हायचे. दादांनी टेलिग्राम घेऊन उघडला.तात्यांच्या शाळेच्या प्राचार्यांचा टेलिग्राम होता. “Your son is sick, admitted to hospital.”मला वाटते , रात्रीचे नऊ, दहा वाजले असावेत. त्या काळी आज-काल सारख्या फार गाड्या ही नव्हत्या.भुसावळ येथून, मुंबई अलाहाबाद मार्गे जबलपूरला जाणारी कलकत्ता मेल त्या काळी सकाळी चार वाजता भुसावळला येत असे. दादा नको-नको म्हणत असतानाही,एलवारिस आजोबा तीन वाजता सकाळी विक्टोरिया बोलवून (विक्टोरिया ही चार चाकी घोडागाडी असायची) दादांना घेऊन स्टेशनवर गेले. भुसावळहून जाणाऱ्या मेल गार्डला सांगून त्यांची थेट जबलपूर पर्यंत फर्स्ट क्लास मधून जाण्याची व्यवस्था केली. तिसऱ्या दिवशी दादा तात्यांना घेऊन सामाना सकट परतले. आई तर त्यांना पाहून रडूच लागली, अगदी हाडांचा सापळा झालेला, दुबळा तात्या पाहून मलाही रडू आले. अर्थात, त्यावेळेस तो स्वतः चालत घरात आला. पण त्याला तत्काळ पलंगावर झोपविण्यात आले. एखाद तासा नंतर तो अगदी गुराने हंबरडा फोडल्या सारखा ओरडत, छाती दाबत उठला. त्या आधी दादांनी आम्हाला सांगितले होते की तात्यांच्या छातीमध्ये अचानक कळा यायला लागल्या व त्यामुळे त्यांना जबलपूरच्या विक्टोरिया हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. दादांनी त्यांची अवस्था पाहून त्यांच्या सामाना सकटच भुसावळला घरी आणले. थोड्या वेळाने दादांनी भुसावळ फॅक्टरीच्या डॉक्टर दत्ताना बोलावून त्यांना दाखवले.त्यांनी काही औषध दिली पण त्याने फार आराम झाला नाही. फक्त काळे आयोडेक्स लावून शेकायचे व डॉक्टर च्या पेन किलर गोळ्या घ्यायच्या, असे उपचार चालू होते. हृदया संबंधी काही आजार असावा या शंकेने डॉक्टर दत्तानी त्यांना रेल्वेच्या दवाखान्या मध्ये दाखवले. तिथेही काही उपचार करण्यात आले पण काहीच उपयोग झाला नाही. अगदी मुंबईच्या के ई एम हॉस्पिटल पर्यंत दाखवूनही काही फार बदल वाटत नव्हता. शेवटी डॉक्टर दत्तानींच घरी त्यांचा उपचार सुरू केला. वास्तविक आम्ही सर्वच त्यावेळी अतिशय घाबरलो होतो. ते जेव्हां कळवळून रडायचे  तेव्हा मलाही रडू फुटायचे.                        सकाळ-दुपार-संध्याकाळ     तिन्ही वेळेस औषधे व गरम आळशी चे पोटीस लावण्यात येत होते.’स्लोन्स लिनिमेंट’ ची छातीवर,पाठी वर मालिश होत असे. मला वाटते की 1954 च्या उन्हाळ्यात ते बरेच ठीक झाले. कळा येणे बंद झाले, भूक लागायला लागली व हिंडणे फिरणे सुरू झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या  बहिणींनी आपल्या भावाची यथायोग्य बडदास्त ठेवली.
        याच सुमारास भुसावळ ऑर्डिनेंस फॅक्टरीच्या क्वार्टर्सची डागडुजीचे काम पूर्ण झाले आणि दादांना ऑर्डनन्स फॅक्टरी च्या पॅक डेपो भागात क्वार्टर देण्यात आला,म्हणून आम्ही तेथे शिफ्ट झालो. ऑफिसर्स क्वार्टर्स म्हणजे वास्तविक ते कुठल्याही दृष्टीने बंगले नसून, मिलिटरी च्या जुन्या बैरेक्स होत्या. एकाला एक अशा चार मोठ्या खोल्या एक थोडी लहान खोली, मागील भागात स्वयंपाकघर समोर प्रशस्त रुंद व्हरांडा, समोर बगीच्या करता भरपूर जागा व मागील दारी अस्ताव्यस्त पटांगण व त्याच्या शेवटी दोन खोल्यांचे सर्वंट क्वार्टर्स होते. बाग करायला आणि खेळायला भरपूर जागा होती. तिथेच मागील दारी बॅडमिंटनचे कोर्ट आखून तात्यां बरोबर मी बॅडमिंटन खेळायला शिकलो.ऑर्डनन्स फॅक्टरी ही भुसावळ शहरा पासून जवळ जवळ चार किलोमीटर अंतरावर होती. त्याच वर्षी अर्थात 1954 साली भुसावळ ला देवकरण लक्ष्मीनारायण हायस्कूल ही हिंदी माध्यमाची शाळा सुरू झाली. अर्थात त्यांना नववीचे वर्ष परत रिपीट करावे लागले. भुसावळच्या डी एल हिंदी हायस्कूलच्या मेरिट बोर्डवर, 1957 सालच्या,शाळेच्या  पहिल्या मॅट्रिक बॅच चे टॉपर म्हणून ‘अरुण पांडुरंग परांजपे’ यांचे नाव अजूनही आहे. 1957 सालच्या उन्हाळ्यात दादा तात्यांना घेऊन मुंबईला गेले. मुंबईला ब्राह्मणवाडी, किंग्ज सर्कल, माटुंगा या चाळीमध्ये आमचे काका, दादांचे वडील बंधू श्री दत्तात्रेय श्रीधर परांजपे हे दोन खोल्यांच्या घरात राहत असत. तात्यांनीचे पुढील शिक्षण तिथून व्हावे असा त्यांचा मानस होता. तात्यांनी 1957 साली मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजच्या  फर्स्ट इयर – इंटर मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस बी.एस.सी हा कोर्स एकंदर चार वर्षाचा असायचा. त्यामध्ये दोन वर्षाची इंटर सायन्स व दोन वर्षाचा बी.एस.सी कोर्स असायचा.1958 साली त्यांनी जळगांवच्या मूलजी जेठा कॉलेज ला इंटर सायन्स सेकंड इयर मध्ये प्रवेश घेतला. दुर्दैवाने मुंबई येथे शिकण्याचा अनुभव फारसा चांगला ठरला नाही. सकाळी नाश्ता नाही, दहा वाजता कॉलेज असल्या मुळे बहुतेक दुपारचं जेवण, बाहेर काहीतरी थोडेफार खाऊन भागवावे लागे. एक कारण म्हणजे आमच्या काकूंचा स्वभाव. शिवाय अभ्यासाला अजिबात जागा नाही, असे अनेक त्रास वर्षभर त्यांना झेलावे लागले. त्यांनी 1959 साली एम.जे कॉलेज, जळगाव येथून इंटर सायन्स तसेच दोन वर्षांनी त्याच कॉलेज मधून बी.एस.सी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केले. 1961 साली त्यांनी एक वर्ष एम.जे कॉलेज, जळगाव येथेच केमिस्ट्री या विषयाच्या डेमॉन्स्ट्रेटर ची नोकरी केली.1962 साली त्यांनी इंदूर येथील होळकर सायन्स कॉलेज मध्ये एम.एस.सी मध्ये प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला, पण पुणे विद्यापीठातून विक्रम विद्यापीठाला वेळेवर डोमिसाइल सर्टिफिकेट न पाठवलं गेल्या मुळे तो प्रयत्न हुकला. ऑगस्ट 1961 मध्ये ऍडमिशन मिळायची शक्यता संपल्या मुळे ते एक वर्ष त्यांनी बर्‍हाणपूरच्या गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल मध्ये विज्ञान शिक्षकाची नोकरी केली. 1962 साली त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून इंदूरच्या होळकर सायन्स कॉलेज मध्ये एम एस सी फिजिक्स प्रीवियस मध्ये प्रवेश घेतला. इथे हे विशेष लक्षात घेण्या सारखे आहे कि त्या काळामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे हे फार दुर्मिळ होते.आजकाल  लहान गावाच्या कॉलेजातून सुद्धा एम.एस.सी. किंवा इंजीनियरिंग कोर्स असतात. त्या काळात असे अजिबात नव्हते.त्या काळी मध्य प्रदेशात फक्त इंदोर, उज्जैन, जबलपूर, ग्वाल्हेर, रायपुर आणि सागर याच जागां वर पदव्युत्तर शिक्षण मिळत असे. त्या दृष्टीने तात्या, हे आमच्या पिढीतील पहिले पदव्युत्तर शिक्षण घेणारे ठरले,आणि वास्तविक त्यांच्या मुळेच मला आणि चि. प्रकाशला एम.एस.सी होता आले. 1964 साली त्यांनी अतिशय यशस्वी रित्या, म्हणजेच मेरिट मध्ये येऊन, एम.एस.सी इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण केले.1964 च्या उन्हाळ्या पासून,त्यांनी नोकरी साठी प्रयत्न सुरू केले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्या दिवसात सामान्यपणे कोणीही शालेय स्तरावर नोकरी करणे पसंत करीत नसे. शक्यतो सर्वच एम.ए किंवा एम.एस.सी झालेल्या लोकांना झालेल्या प्रायव्हेट किंवा सरकारी कॉलेज किंवा इतर संस्थां मध्ये नोकरी सहज मिळत असे. या प्रयत्नां मध्ये त्यांनी अनेक जागां वर नोकरी करता अर्ज केले. पण  मनासारख्या पगाराची नोकरी न मिळाल्या मुळे त्यांनी मुंबईच्या बी.आय.इ.टी मधून रेडिओ इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स सुद्धा करून घेतला. 1962 च्या चीन भारत युद्धा नंतर , त्यावेळेस भारतात एकंदर आर्थिक मंदीची लाट होती. काय कारण असेल माहीत नाही, पण कदाचित या मुळेच 1962 पासून अनेक वर्षें मध्यप्रांत आणि महाराष्ट्रा मध्ये लोकसेवा आयोगाच्या (पी.एस.सी) नोकऱ्यांच्या जागा रिकाम्याच ठेवण्यात आल्या, त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अतिशय कमी झाली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, त्यांना आफ्रिकेतील एक देश लिबियाच्या राजधानी त्रिपोली येथील एका कॉलेजाने नोकरी देऊ केली. तिथेही सरकारी दिरंगाई  आडवी आली, आणि वेळेवर पासपोर्ट न मिळू शकल्या मुळे तेथे रुजू होऊ शकले नाही. शेवटी 65 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्यांनी छिंदवाडा जवळील आमला येथील सैनिक स्कूलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली. जेमतेम एक दोन महिने नोकरी केली असेल तेवढ्यात त्यांना मध्यप्रदेश शासना कडून शहडोल च्या मायनिंग पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये लेक्चरशिप मिळाली. एकंदर पाहता, एक अतिशय हुशार अशा मनुष्याला या बाबतीत मात्र परिस्थितीने वेळोवेळी अतिशय मानसिक त्रास दिला.शेवटी 1966 च्या एक फेब्रुवारीला ते शहडोल येथे सरकारी नोकरी मध्ये रुजू झाले. जीवनाच्या दुसर्‍या अध्याया चा हा भाग सुरळीत सुरू झाला आणि त्यांना जीवनात थोडी स्थिरस्थावरता प्राप्त झाली. मध्यंतरीच्या काळात 1965 मध्ये मंदाताईंचा विवाह राजेंद्र नगर, इंदूर चे श्रीयुत मधुकरराव कुलकर्णी यांच्या बरोबर संपन्न झाला. या विवाहात त्यांनी आपल्या आई-वडिलांना शक्यतो भरपूर आर्थिक सहाय्यही केले आणि कामात सुद्धा खूप जबाबदारीने हातभार लावला. दुर्दैवाने सर्वात मोठ्या बहिणीचे लग्न होऊ शकले नाही. जेव्हा तिने लग्नाला स्पष्ट नकार देऊन, आई-वडिलांना, आपण आपल्या मोठ्या मुलाचे लग्न करावे असे सांगितले, तेव्हा दु:खी अंत:करणाने, पण नाइलाजाने जगरहाटीला धरून त्यांनी आपल्या मोठ्या मुला करिता वधु पाहण्यास सुरुवात केली.स्थळ अतिशय उत्तम होते ,ह्यात दुमत नाही. अतिशय देखणा आणि सुस्वभावी मुलगा, वर सरकारी नोकरी , आणि विशेष म्हणजे (चहा सोडता) कुठले ही व्यसन नाही . साहजिकच बऱ्हाणपूरच्या अनेक स्थानिक वधुपित्यानी सर्व प्रयत्न करून पहिले , पण पहिली दोन वर्षें तरी उपयुक्त अशी वधू  तात्यांना  किंवा घरच्या मोठ्याच्या पसंतीस उतरली नाही. 1966 साली मी शहडोलच्या गवर्नमेंट कॉलेज मध्ये एम.एस.सी केमिस्ट्री मध्ये प्रवेश घेतला.वास्तविक मी बी.एस.सी झाल्या नंतर,ति.ताई वर आणखी जास्त आर्थिक भार पडू नये,- कारण चि.प्रकाश सुद्धा हायस्कूल मध्ये पोहचला होता,- ह्या दृष्टीने नोकरी करायचे ठरविले होते.बी.एस.सी झालेल्या नंतर भुसावळ येथील शाळेत मला पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये नोकरी मिळाली होती,व मला २० जून ला रजू होण्यास सांगितले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत बऱ्हाणपूरला आलेल्या तात्यांनी त्याच्या खूप विरोध केला आणि मला एम.एस.सी ला प्रवेश घेण्याचा आग्रह केला. वास्तविक तात्यां मुळेच मी एम.एस.सी करू शकलो. शहडोलच्या वास्तव्यात मला माझ्या मोठ्या झालेल्या भावाचे या आधी न कळलेले अनेक उत्तम गुण कळले. पण त्या विषयीचा उल्लेख आपण नंतर करूच. 1967 सालच्या सुरुवातीला दादांनी धुळे (पश्चिम खानदेश,महाराष्ट्र) येथील मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर  असलेले श्रीयुत तात्यासाहेब भुस्कुटे यांच्या एकुलत्या एक कन्या सुनंदा यांना तात्यांच्या वाग्दत्ता वधू म्हणून पसंती दिली. तात्यांची पसंती मिळाल्यावर, त्याच वर्षी १९ में, शुक्रवार रोजी उभयतांचा विवाह धुळे येथे थाटात संपन्न झाला. भुस्कुटे यांच्या घरील आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक, ‘अरुण’ बरोबर ‘अलका’ या नव्या नावाने माझी वहिनी, परांजप्यांच्या घरी आली. आल्याआल्याच त्यांच्या मोकळ्या स्वभावाचा प्रत्यय मला आला. त्यांनी आपल्या दोघांना दिरांना ‘मी जरी मोठी असली तरी मला अहो जाहो करायचे नाही’ असे अतिशय मनमोकळेपणाने सांगितले. 1967 च्या 27, 28 जूनला आम्ही बऱ्हाणपूर येथून आई बरोबर शहडोल ला आलो. आमची मोठी बहीण ति. सुशीला ताई, परिस्थिती मुळे स्वभावाने  काहीशी हट्टी आणि तापट होती. त्या मुळे तिला अशी शंका होती की या विवाहा नंतर मला शहडोल येथे अभ्यासा करायला किती अनुकूलता मिळू शकेल.मी तिला दोष देत नाही किंवा तिची चूक आहे असेही म्हणत नाही. पण परिस्थिती आणि पूर्वीच्या कटु अनुभवां मुळे मुळे कदाचित प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याचा तिचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नव्हता हे मात्र खरे.मी मात्र ह्या गोष्टींचा फारसा विचार केला नाही,कारण वास्तविकता वेगळीच होती.वहिनी आल्या नंतर मला आजिबात काम करावे लागले नाही,उलट अभ्यासा करता भरपूर वेळ मिळाला.फायनल ईयर च्या स्पेशलायझेशन करता बराच कठीण व किचकट कोर्स होता व फार मोठे प्रैक्टिकल्स असायचे,त्या मुळे कधी कधी घरी परतायला रात्री ८ ही वाजायचे, तरीही मला (व शेजारच्या घरात रहाणाऱ्या कमलेश शर्मा नावाच्या माझ्या वर्गमित्राला सुद्धा !!) गरम चहा/कॉफी मिळायची. रात्री ही अभ्यासाला बसल्यावर मला टेबलावर दूध देऊन मगच ते दोघे झोपायला जायचे, भले रात्रीचे बारा वाजोत !
           माझ्या पोस्ट ग्रेजुएशनच्या यशात तात्यांच्या बरोबरीने वहिनी सुद्धा बरोबरीच्या भागीदार होत्या, हेच नि:संशय खरे आहे.
           तात्यांचे बालपण दोन मुलींच्या पाठीवर येणारा भाऊ या दृष्टीने अतिशय कौतुकात गेले. आजींचे जरी लाड असले तरीही
आई आणि विशेष करून दादांच्या
कडक शिस्तीमुळे ते कधीही ‘लाडावलेला मुलगा’ या गटात आले नाही. या उलट आपल्या बहिणींशी ते अधिक दिलेला खाऊ (आजींच्या नकळत !!) नेहमी शेअर करायचे. अर्थात हे ताई व मंदाताईंनीच मला सांगितले होते. तरी ही यथायोग्य बालसुलभता व खट्याळपणा सुद्धा आपल्या जागेवर होताच. तात्या, जवळ जवळ आठ वर्षाचे असताना माझा जन्म झाला. त्यामुळे मी चार पाच वर्षांचा होई पर्यंत ह्या तिघांची ची तिकडी, बारा ते सोळा वर्षे वयाची झाली होती. त्यामुळे हे तिघे, लहान भावाला, अर्थातच आजींची नजर चुकवूनच, माझ्याशी थोडी फार चिडवा चिडवी आणि खोड्या करायचे. एकदा तर रिकाम्या गटारीत तुरुतुरु जाणार्‍या भल्या मोठ्या पिवळ्या विंचवाला,’रवी तो पहा खेकडा चालला आहे,जा त्याला पकडून आण, आपण त्याच्या पायात दोरा बांधून खेळूं’ वगैरे गंमत ही व्हायची.’मागील दारी नाल्या जवळच्या पेमली बोराच्या (मोठी बनारसी बोरं) झाडावर रात्री आस्वला चे भूत येतं असं हे मला सांगायचे ,’जर तू रात्री जाऊन त्याच्यावर चॉक ने कट्टस वरून आलास तर आपण सर्वांना एक दिवस भर स्वर्ग पहायला मिळेल !!!’ — तो बालिश अवखळपणा अजूनही त्या तिघां बरोबर परत जगावासा वाटतो.
तरी ही या तिघांनी त्यांच्या संगतीत भरपूर राहू दिल्यामुळे मी कमी वयातच बराच धीट (व आगाऊ, मूड !!) झालो. शाळेत जायला लागल्या नंतर मी लबाड्या सुद्धा खूप करत असे, पण तात्यांना त्याची पूर्वकल्पना कशीती नेमकी असत असे. त्यांच्या बरोबर राहून जवळजवळ सहा सात वर्षांपासून ते 21-22 वर्षाचा होई पर्यंत मी एका परीनं तात्यांचा अप्रेंटिस म्हणूनच असंख्य गोष्टी शिकलो. कोणी मनुष्य नुसत्या पाहून, काही आई वडिलांना विचारून, इतक्या गोष्टी शिकू शकतो, हा गुण असाधरण होत्या!
       त्या गमती ही मी थोड्या वेळात सांगणार आहेच. पण त्याच्या आधी टापटीप आणि शिस्ती विषयी. माझ्या मतें ताई, मंदाताई आणि तात्यां मुळेच आम्हा दोघा धाकट्या भावंडांना बर्‍यापैकी आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवणे कळू लागते. मी लहान असल्या पासून माझ्या आठवणीतील दादा (वडील) सायकल वरून फॅक्टरीमध्ये सकाळी सातला जात. त्या काळी सायकल असणे ही एक मोठी गोष्ट होती आणि प्रत्येक जण तिला अतिशय स्वच्छ ठेवत असे. ताई व मंदाताई सकाळी साडे सहाला शाळेत जात असत त्यामुळे तात्यांची ड्युटी दादांचे जोडे पॉलिश करून ठेवणे व सायकल स्वच्छ करणे ही होती. दर दिवशी नुसता फडकं न मारता, अतिशय पद्धतशीरपणे सायकल च्या रिम व स्पोक्स  सुद्धा पुसून स्वच्छ करावे लागत. तात्यांनी हळूहळू हे काम मला शिकवले व एक-दोन वर्षात अलगदपणे ते माझ्या गळ्यात पूर्णपणे अडकवले. पण ह्यात लबाडी नव्हती, प्रत्येक गोष्ट ते मला स्वतः करून दाखवत आणि मग करायला लावत. त्यांना आठवीत गेल्यावर स्वतःची सायकल मिळाली, व त्यांनी तिच्यावर प्रयोग सुरू केले. त्यावेळेस सायकलची पंक्चर नीट करणे हे एक मोठे तंत्र होते. त्यांनी सर्व यंत्रसामग्री जमा करून सायकल ची संपूर्ण ओवरॉलिंग, रिपेरिंग, पंचर काढणे मला शिकवले. ते सायकल वरून मला कटनी शहरात सायकलच्या दुकानात घेऊन जायचे आणि एक्सेल, कोन , ब्रेक शूज पासून ते अगदी वॉल बेरिंग पर्यंत सर्व वस्तू आणून उन्हाळ्यात/ दिवाळीत दोन्ही सायकल्सची ओवरॉलिंग करायचे. सायकलचा पंचर काढायला आम्ही कधीही दुकानात गेलो नाही.स्वभावाने तात्या अतिशय शांत,सोशीक आणि कधीही त्रागा न करणारे होते. पण प्रसंग आला की त्याचा राग काय होता हे मलाच माहीत आहे. एकदा काही तरी अशा प्रकारचे रिपेरिंग चे काम करीत असताना,(मला वाटते दादांच्या सायकलच्या ओव्हरआॅलिंग वरून असावे, कारण दादांना उन्हाळा, दिवाळीच्या सुट्ट्या नसायच्या, आणि त्यांच्या सायकलचे काम फक्त रविवारच्या एका दिवसात पूर्ण करावे लागे) माझ्या हातून (नकळत!!!?) काही तरी मोठी चूक झाली, त्यांचा चेहरा चिडून लालबुंद झाला, आणि अचानक त्यांनी मला जवळ पडलेली हातोडी उचलून ठपकन नाकावर मारली. माझ्या नाकातून रक्ताची धार लागली. ना मी भोकाड पसरले, ना तात्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.आईची चार बोलणी ऐकून , माझ्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवून रक्त थांबवण्यात आले, आणि परत गुरुजी आणि शागिर्द आपल्या कामावर हजर झाले!! विजेची कामें, तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू रिपेअर करणे, नव्या बनवणे, फोटोग्राफी, कॅमेऱ्यातील फिल्म डार्करूम मध्ये काढून तिचे डेव्हलपिंग आणि फिक्सिंग करून कॉन्टॅक्ट प्रिंटिंग ने पॉझिटिव्ह फोटो तयार करणे, रेडिओच्या रेजिस्टन्स चा कलर कोड ओळखणे, दिवाळीत आकाश कंदील बनवणे (गोल फिरणाऱ्या आकाशकंदीला चा एक प्रकार असतो – पायली, तो मात्र आम्हां दोघांना कधीही जमला नाही !!) शिलाई ची पाय मशीन नीट करणे, बुक बाइंडिंग, बॅडमिंटन, क्रिकेट खेळणे, पतंग उडवणे, अतिशय उंच झाडांवर न घाबरता चढणे (व प्रसंगी पडल्यास न रडणे) अशा अनंत गोष्टी व विद्या मी तात्यां कडून शिकलो. कटनी,भुसावळ आणि शाहजहांनपुर येथे आमच्या बंगल्यांच्या तिन्ही बाजूंनी भरपूर मोकळी जागा होती.तिथे दादांनी सकाळ-संध्याकाळ अतोनात मेहनत घेऊन, भरपूर मोठी फळा फुलांची आणि भाज्यांची बाग तयार केली होती. या कामामध्ये जवळजवळ सर्व कुटुंबच सहभागी होत असे.फुलबाग किंवा भाज्या म्हणजे नुसत्या इकडून तिकडून मागून आणलेल्या रोपां
बसून तयार केलेली जुजबी बाग नसायची. दादा आणि तात्या दोघं जण बसून मुंबईच्या ‘पेस्तनजी पोचा’ व ‘सटन सीड्स’ या कंपन्यां कडून विविध प्रकारची देशी व विदेशी फुलं व वेगवेगळ्या भाज्यांची बियाणे मागवत असत. वडिलां पासून मिळालेला हा छंद त्यांनी अगदी शहडोल पर्यंत जोपासला. त्या योगे मी म्हणू शकतो कि जर ते जर शिक्षक झाले नसते, तर एक उत्तम शेतकरी नक्कीच झाले असते.  
          त्यांना वाचनाची अतिशय आवड होती,व चांगली चांगली पुस्तकें (मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांची) ते लायब्ररी मधून,मित्रां कडून किंवा प्रसंगी शक्य झाल्यास विकत घेऊन,  स्वतः वाचत आणि मलाही वाचायला लावत. त्यांचीही एक मजेदार पद्धत होती, स्वतः एखादे पुस्तक वाचून झाल्यावर, ते मला त्या पुस्तकात काय विशेष आहे हे थोडक्यात सांगायचे, पण त्या मध्ये जी मजेदार किंवा गूढ गोष्ट असायची, त्याची फक्त हिंट देऊन सोडून देत.त्या मुळे मला ते पुस्तक उत्सुकते पोटी वाचायची इच्छा व्हायची. मला आठवते की एकदा त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या एका बंगाली कादंबरी चा हिंदी अनुवाद “हंँसली बांँक की आत्मकथा” नावाचे पुस्तक मात्र दोन दिवसा करता मिळवले. साधारण दोन अडीच किलोचे , साडेसहाशे पानांचे अतिशय जाडजूड पुस्तक होते. आम्ही दोघांनी दीड दिवसात त्या पुस्तकाचा फडशा पाडला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पुस्तक परत केले.
          हे सर्व पाहिल्यावर आणि अनुभवल्यावर मला ते गूढ उमगले कि त्यांना जळगाव बर्‍हाणपूर, शहडोल ,खिरसाडोह आणि विशेष करून संपूर्ण जबलपुर येथील त्यांचे विद्यार्थी व सहकारी ‘क्लासिक, युनिक आणि मॅजिकल टीचर’ का म्हणत असत. ह्या बाबतीत मला मात्र ते तेवढे जमले नाही, त्यांनी दिलेला कानमंत्र मी अजून इतर ज्यूनियर शिक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो. ते म्हणत असत, की जरी तुम्हाला विषय हस्तकमलावगत माहीत असला, तरीही काही तरी नवे शोध, विचार, शिकवण्याच्या एखाद्या नव्या अॅप्रोच ची पद्धत अशी उरलेली असतेच, त्याच्या करता तुम्हाला दर दिवशी, विषय नव्याने तयार करणे जरुरीचे असते. विषयवस्‍तु एक गोष्ट असते आणि ती जागत्या आणि जाणत्या विद्यार्थ्यां समोर,सर्व श्रेणींच्या विद्यार्थ्याना कळेल अशा पद्धतीने, उलगडून समजावणे ही दुसरी गोष्ट असते व तोच सर्वात मोठा चॅलेंज असतो. तिसरी गोष्ट ही लक्षात ठेवावी की जर तुमच्या एखाद्या सामान्य विद्यार्थ्याला, एखादा टॉपिक एक वेळा शिकवल्या वर पूर्णपणे समजला नाही, तर तुम्ही एक शिक्षक म्हणून हरलात हे शाश्वत सत्य असते.त्यामध्ये विद्यार्थ्याची चूक नसते,तर शिक्षकाच्या प्रयत्नात कमतरता असते. या सर्वांवर उपाय एकच, आणि तो म्हणजे अध्यवसाय.तो टॉपिक परत परत नव्या तऱ्हेने तयार करा.
             याच्या शिवाय त्यांना अनेक कला अवगत होत्या, ज्या मला कधीच जमल्या नाहीत. त्या पैकी पहिली, त्यांना शिवण कला अतिशय सुंदर येत असे, अगदी कटिंग सकट! दुसरी, जी मला सोडून ताई व मंदाताईला  माहित आहे, ती म्हणजे गायन कला!!! होय,अगदी क्लासिकल नाही तरीही सिनेमा ची गाणी ते छानच म्हणायचे.आमच्या घरी इतर सर्व कला असल्या तरी गान सरस्वती,कोणा वर फारशी प्रसन्न नव्हती‌.म्हणून ह्याचे कौतुक विशेष. मला वाटते आता पुरे झाले.पाककला, सजावटीच्या वस्तू बनवणे, नकला आणि भाषण कला वगैरे वगैरे असंख्य गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पण ते नंतर.कारण जर मी आता त्यांच्या बद्दल बोलू लागलो, तर
असे वाचक,जे त्यांना नीट ओळखत नाहीत,ते बहुतेक तरी असे समजतील कि हा गृहस्थ आपल्या मोठ्या भावा विषयी फारच अतिशयोक्तीपूर्ण गप्पा मारायला लागला आहे.
                तात्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यां  विषयी मी ह्या व्यक्तिचित्राच्या शेवटच्या, अर्थात दुसर्‍या भागात, अधिक लिहिन.पण ते अतिशय सोशिक आणि शांत स्वभावाचे होते व हा गुण दोन गोष्टीं मुळे अधिक प्रकर्षाने महत्त्वाचा होतो.एक तर दोन बहिणींच्या पाठीचा हा पहिला मुलगा ,सर्वांचा अतिशय लाडका, तरीही त्यांनी कधीही त्याचा गैरफायदा घेऊन हेकेखोरपणा केला नाही व सदैव सौम्यच राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठचा भाऊ म्हणजेच मी, स्वभावाने अतिशय तापट आणि हट्टी, कदाचित या कारणाने त्यानीं आपल्या हौसा मौजाना बरीच मुरड घातली असणार. मला या गोष्टीची थोडी कल्पना आहे, कारण म्हणतात ना की, ‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण !’ निरपेक्षपणे त्यांच्या जीवनाकडे पाहिले कि असे वाटते – अरे हा गृहस्थ इतका साधा आणि निगर्वी कसा ? असो.
       तात्या माझ्या जीवनातील एक अशी व्यक्ती होते, त्यांच्या विषयी फार थोड्या गोष्टी सांगितल्या. खूप काही सांगणे मनात राहून गेले. कविवर्य भा.रा. तांबे यांनी एका गाण्यात म्हटले आहे खरे,
‘मी जाता राहील कार्य काय,
जन क्षण भर म्हणतील हाय हाय.’
       हे तर आहेच, पण तरीही, आपल्या जीवनात काही व्यक्ती असतात, ज्यांच्या विषयी आठवणींची एक अखंड ज्योत मनात तेवत असते, म्हणूनच आपण त्यांची नक्कल करून त्यांच्या सारखे व्हायचा प्रयत्न करत असतो. जीवनात अशा लोकां मुळेच कुठेतरी दूर जळत असलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध , आठवणींच्या रूपात सदैव दरवळत असतो.
***********************
रवींद्र परांजपे,
+919644032329
rpparanjpe@gmail.com
      

एक ग्राम ची मासोळी

एक ग्राम ची मासोळी,बिचारीच्या पोटात ट्यूमर !!!
ब्रिटन येथील ब्रिस्टल मधील वेट्स वेटरनरी हॉस्पिटल मध्ये मॉली जातीच्या एका गोड फिश च्या पोटात असलेल्या ट्यूमरच्या एका गाठीचे ऑपरेशन करण्यात आले.वेटस् हॉस्पिटलच्या सोनिया माइल्स ने सांगितले कि ही सोनेरी मासोळी (मालकाचे नाव सांगण्यात आले नाही) एका ब्रिस्टल मध्ये रहाणाऱ्या एका गृहस्थाला त्याच्या शेजार्‍याने ही फक्त ₹ ८९ किंमती ची छोटीशी मासोळी,भेट म्हणून दिली होती.काही दिवसातच त्या गृहस्थाचे ह्या छोट्या सोनेरी मासोळीवर अतिशय जीव जडला. पण दोन तीन आठवड्यानंतर त्याने पाहीले कि ती चिमुकली हळू हळू खाणे पिणे सोडून, मरगळायला लागली. तत्काळ त्या गृहस्थाने तिला ब्रिस्टलच्या वेट्स वेटरनरी हॉस्पिटल मध्ये आणले. हा पेशंट हॉस्पिटलचा आता आता पर्यंतचा सर्वात लहान पेशंट होता, वजन फक्त एक ग्रॅम !! तिला तिथल्या रेसिडेंट सर्जन ने चिमुकल्या प्राण्यांच्या सर्जरी मध्ये नेले. बाह्य लक्षणां मध्ये तिथे पोटाचे मध्यभागी एक छोटासा उभार दिसून येत होता,पण स्कैन मध्ये असे दिसून आले कि तिच्या मुखविवराच्या शेवटी एक गाठी सारखा ट्यूमर झाला होता.सर्जन ने तिचे तत्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोल्डफिशला शांत करण्यासाठी तिला पाण्याच्या मोठ्या टब मध्ये ठेवण्यात आले. ती थोडी शांत झाल्या नंतर तिला ऑपरेशन टेबलवर (म्हणजेच एका काचेच्या मोठ्या खोलगट पेट्री डिश मध्ये) घेण्यात आले!

तिला नीट श्वसन करता यावे म्हणून पेट्री डिश मध्ये पाण्याची सतत धार सोडण्यात आली. चाळीस मिनिटे चाललेल्या या ऑपरेशन मध्ये सर्जन्सनी अति सूक्ष्म एण्डोस्कोपी द्वारे तो ट्यूमर काढण्यात आला, व त्या जागेला जलरोधी सिमेंट पेस्ट द्वारे सील करण्यात आले.

नंतर तिला अधिक ऑक्सिजन असलेल्या पाण्याच्या जार मध्ये सोडण्यात आले. थोड्या वेळाने तिचा मालक ₹ ८९१२ भरून घरी घेऊन गेला.
भाग्यवान ती मासोळी !! आणि त्या पेक्षा सुद्धा धन्य तिचा मालक.अर्थात,ह्या सर्वां बरोबरच हे सर्व शक्य करण्या करता जी आधुनिक अतिसुक्ष्म यंत्रे व आॅपरेशनची वैद्यकीय उपकरणे तयार करणारे वैज्ञानिक आणि अशा वैद्यकीय उपकरणां द्वारे सूक्ष्म एण्डोस्कोपिक सर्जरी करण्यात निष्णात सर्जन्स , हे सर्वच अशा नवल कथांचे हीरोज असतात.
***********************

पुस्तक मित्र :१

पुस्तक मित्र :१

पुस्तकें ही गेल्या शतकातील मानवाचे सर्वात मोठे मित्र. गेल्या शतकातील या करिता म्हणालो, कारण आजकाल कंप्यूटर, स्मार्टफोन या मधून मनुष्याला जर उसंत मिळाली तर तो काही लेखी साहित्य वाचायला मोकळा होणार. पण बहुसंख्य पासष्ट,सत्तर वया पर्यंत चे लोक , कीबोर्ड वर टिक टिक, टुक टुक करण्यातच गुंग असतात.नंतर जेव्हां जीवनात थोडा निवांतपणा येतो, तेव्हां हळू हळू दृष्टी चा त्रास द्यायला लागते. मग असे लोक शेल्फ पर्यंत जाऊन कागदी पुस्तकें काढणार काय, आणि वाचणार काय ? त्यातल्या त्यात जे अगदीच वाचनवेडे आहेत, त्यांच्या करिता किंडल,कोबो वगैरे कंपन्यांनी ई-बुक रीडर नावाचे मोठे मोबाईल वजा इलेक्ट्रॉनिक पुस्तक काढले आहे. ते बरे असते, कारण त्या मध्ये अक्षरांचा आकार (फोन्ट साइज) पानाचा चमकदारपणा (ब्राईटनेस) वगैरे बदलता येतो, त्या मुळे लोकांनाही वाचणे बरेच सोपे होते. अर्थात त्याच्यात सुद्धा गोम आहेच ! जर तुम्हाला इंग्रजी पुस्तकं वाचायचे असतील तर त्यात भरपूर चॉईस आहे, पण ज्यांना मराठी व हिन्दी पुस्तकें वाचायची आहेत, ती संख्या अगदीच थोडी आहे. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये बरीच मराठी पुस्तकें पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत.अशा प्रकार चे बदल ही वेळेची गरज आहे.कार्बन फुटप्रिंट्स जर कमी करायचे असतील तर बांबू आणि लाकूड यांपासून तयार होणार्‍या पारंपरिक कागदा चा उपयोग आता कमीत कमी करणे ही पृथ्वी वाचविण्याची गरज झाली आहे. हळू हळू जगातील बर्‍याच मोठ्या मोठ्या लायब्रर्‍या आता डिजिटल होऊ लागल्या आहेत. भारतात सुद्धा वर्ष बऱ्याचशा विद्यापीठांच्या लायब्ररी, ई-लायब्ररी मध्ये परिवर्तित होत आहेत. याचा भावनिक भाग आपण नंतर केव्हा तरी पाहू.पण ह्या नवीन प्रगत शास्त्रा मुळे तीन मुख्य फायदे झाले आहेत. एक तर अशी प्राचीन पुस्तकें, ज्यांची एकच प्रत हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे, त्यांच्या हुबेहूब मूळ हस्तलिपित डिजिटल प्रति,अनेक लोकांना एकाच वेळेस उपलब्ध होऊ शकतात. दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या वजन आणि आकाराच्या तुलनेत अशी ई-पुस्तकें अतिशय सूक्ष्म जागेत साठवली जाऊ शकतात. तसेच किंमतीच्या दृष्टीने कागदावरील छापील पुस्तकांच्या मानाने डिजिटल पुस्तकांची किंमत नगण्य असते. आजकाल बहुतेक सर्व ई-लायब्ररीज फिजिकल मेमरी शिवाय वर्च्युअल क्लाऊड मध्ये सुद्धा साठवलेल्या असतात. तोटेही अर्थात आहेतच.मुख्य तोटा आर्थिक आहे आणि तो बिचाऱ्या लेखकांच्या वाट्याला येतो. कागदी पुस्तकांच्या मानाने, अजून तरी इलेक्ट्रॉनिक लेखनाला तेवढा मोबदला मिळत नाही, हे कटू सत्य आहे. दुसरी गोष्ट आपल्या येथील डिजिटल वारसा व लेखन , अजून सायबर कायद्याच्या दृष्टीने बरेच असुरक्षित आहे.त्यामुळे कॉपीराईट घेऊन सुद्धा, अनेक वेळा ई-पायरसी व फिशिंग मुळे, तसेच हॅकर मंडळीच्या उपद्व्यापां मुळे, लेखक आणि मूळ डाटा यांचेही अतोनात नुकसान होते. पाणी पाऊस वारा इत्यादी पंचमहाभूतें व सहावे म्हणजे चोर, कीटक आणि उंदीर, हे मिळून एखाद्या कागदी पुस्तक लायब्ररीचे जितके नुकसान वर्षभरात करू शकत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान एक अदृश्य वायरस एखाद्या डिजिटल लायब्ररी चे क्षणार्धात करून टाकतो. असो, या सर्वां मधून सुद्धा हळू हळू मार्ग निघतीलच. ही गोष्ट तर नक्कीच, कि भविष्यात, स्वतःला व्यक्त करण्याचे लेखन हे माध्यम आपल्याला कागदा पेक्षा स्क्रीन वरच अधिक पाहायला मिळणार . एक लहानसे उदाहरण देऊन आपल्या गप्पा येथेच संपवू. खाली एक वेब लिंक शेअर करत आहे, त्यावर टिचकी मारून तुम्ही किती तरी पुस्तकें व लेख वाचू शकता. विशेष करून असे वाचक ज्यांना श्री शिवछत्रपती यांच्या विषयी साहित्य वाचायला आवडत असेल.
(अर्थात हे सांगण्याची गरज नाही, कि अशा लिंक्स कॉपीराईट प्रोटेक्टेड असतात आणि म्हणून त्यावेळी साहित्याचा किंवा माहितीचा उपयोग केवळ स्वतःच्या वाचना करता करावा. त्याच्या प्रती काढून त्यांचा व्यवसायिक उपयोग हा एक गुन्हा आहे.)
https://www.discovermh.com/marathi-pdf-book-free-download/
(साभार गुगल,
discovermh.com आणि इतर संबंधित सर्व स्रोत)
**************************

थोड़ी ढील दे दे भाई…..

थोड़ी ढील दे दे भाई ….
कुछ दिन पहले ६७ वां हिंदी दिवस था, और फिलहाल यह हिन्दी सप्ताह भी खत्म हो रहा है।जगह जगह खानापूर्ति के पोस्टर उतर रहे हैं।कई लोग शायद राहत की सांस ले रहे हैं। यही हमारा भारत बनाम इंडिया है। पर यहां लिखा रहता है, ‘प्रेस टू फॉर हिन्दी !!’
शिक्षक हूंँ तो ऐसे मौके याद रह ही जाते हैं। हिन्दी सप्ताह खत्म, हिन्दी खत्म ! डूबते सूरज को भी कोई अध्र्य देता है भला! इसी लिए मैंने मेरे मन की बात लिखने के लिए आज का दिन ही चुना।
पिछले ही हफ्ते की बात है , सुबह-सुबह एक भाई मिले, भूल से उन्हें हिन्दी दिवस की बधाई दे बैठा। कैसे : ‘भैयाजी, हिन्दी दिवस मुबारक !’

हिन्दी दिवस आते ही सभी व्याकरणविद और पं.रामचन्द्र शुक्ल के ताऊ बन जाते हैं , फिर यह साहब क्यों पीछे रहते ! वैसे मैं थोड़ा हक्का-बक्का कि क्या पता कौन सा गुनाह हो गया ? हुआ यह था, कि यह सज्जन , हिंदी के अध्यापक भी हैं और अपने आप को भाषा का ध्वजवाहक भी मानते हैं। फिर भी नहीं समझे होंगे, तो यूं समझ लीजिए कि वे स्वयं बिल्कुल शुद्ध हिन्दी बोलेंगे और आपसे भी वैसी ही सुनना चाहेंगे। बिगड़ कर बोले ‘कम से कम आज के दिन तो शुद्ध भाषा का प्रयोग करके शुभकामनाएं देनी चाहिए , यह मुबारक कहां से ले आए? तुम्हें कितने दिन से समझा रहा हूं ,कि उर्दू, फारसी, अंग्रेजी की मिलावट हिन्दी के साथ मत किया करो।’
वास्तव में हिन्दी के ‘कठिन’ होने की शिकायतें ऐसे अतिवादी और हठी दृष्टिकोण के कारण भी होती हैं, जो गलत भी नहीं है। महात्मा गांधी ने वर्धा में, सन् 1930 में ही कहा था, कि भविष्य में हिन्दी का ‘हिंदुस्तानी’ स्वरूप ही, इस देश को एक साथ जोड़ने का कार्य कर सकता है।
हम १९५३ से लगातार १४ सितंबर को ‘हिन्दी दिवस’ मना रहे
हैं।(क्यों, यह किसी को मालूम नहीं!!) यह (और अन्य कई राष्ट्रीय दिवस) हमारे लिए केवल प्रतीकात्मक बन कर रह गए हैं। अगर हिन्दी (सह)राजभाषा है तो फिर संदेशों, शुभकामनाओं के संदेश,दिखावे के समारोहों के आडंबरों की क्या आवश्यकता है। मेरे एक परिचित ने इस बात पर,यह स्पष्टीकरण दिया,कि हम स्वतंत्रता दिवस, गणराज्य दिवस वगैरह भी एक इसी प्रकार मनाते हैं,वैसे ही हिन्दी दिवस भी मनाते हैं। नहीं भाई, १५ अगस्त और २६ जनवरी यह आनन्द और उत्साह के दिन जरूर हैं,पर राजकीय स्तर पर इन्हें मनाने का एक निश्चित विधान और प्रक्रम (प्रोटोकॉल और डेकोरम)तय है। अन्य राष्ट्रीय दिवसों, जैसे हिन्दी दिवस, बालदिवस, शिक्षक दिवस आदि में ‘स्मरणीयता’ तो है,पर मनाने के नियमों की स्थूलता है। जैसे देखिए न, सरकारी कार्यालयों के लिए सचिवालय से जिस प्रकार के निर्देश आ जाएं, बैंकों में जो मुख्यालय से करने के लिए कहा जाए , इस प्रकार के कार्यक्रम आयोजित होते हैं। विद्यालयों में अपना अपना अलग अलग तरीका होता है। खैर, दिवस तो मन ही जाता है।
हिन्दी दिवस पर सब लोग हिन्दी के नाम से रोते हैं, आगे बढ़ नहीं रही है, सब लोग नहीं बोलते, दक्षिण भारत वाले नहीं बोलते, समझ जाते हैं पर बोलने से इनकार करते हैं, अंग्रेजी का ही बोलबाला है ।वगैरह-वगैरह। मेरा मुद्दा यहां पर यही है,कि आप हिन्दी का झंडा ऊंचा चढ़ाना चाहते हैं और दूसरी तरफ रस्सी को खंबे से ढीला भी करना नहीं चाहते। अगर अकेली हिन्दी को आपको सम्पूर्ण राष्ट्र की संपर्क भाषा, राजभाषा की जगह राष्ट्रभाषा बनाना है, तो आपको अपनी भाषिक शुद्धता के मापदंड कुछ कम करके,अन्य प्रादेशिक भाषाओं के प्रचलित शब्दों को उदारता के साथ रास्ता देना होगा। यह ठीक है कि जब आप हिन्दी साहित्य की पढ़ाई कर रहे हों, कोई साहित्यिक लेख लिख रहे हों ;तब यह आग्रह समझ में आता है की शुद्धता का मापदंड पूरी तरह अपनाया जावे। मैं यह कतई नहीं कह रहा कि अगर आपकी मातृभाषा हिन्दी है या आपकी भाषा की पकड़ अच्छी है, तो आप जानबूझ कर गलतियां करें। आप दर्जनों उर्दू शब्दों का, हिन्दी समझ कर प्रयोग करते हैं,सोशल मीडिया पर शेर-ओ-शायरी के पेज भरे रहते हैं।उर्दू तो खैर हिन्दी की मुंहबोली बहन है, मौसी जी हैं तो उसका तो हम धड़ल्ले से प्रयोग करते हैं।पर अगर हम दिल्ली की पंजाबी,
हरियाणवी मिश्रित ‘ओए इक बंदा भेज्ज इधर भी’ या मुंबई की खास बम्बइया के ‘हीरो,तू पुट ले इदर से,भौत थकेला लग रिया है।’ को हिंदी के रूप में पचा लेते हैं; तो अन्य भाषा भाषियों की हिन्दी के अटपटे स्वरूपों पर भी हमें आपत्ति नहीं होनी चाहिए।
बात केवल अन्य भाषा भाषियों के साथ हिन्दी में सम्पर्क करने की है। अगर अहिन्दी प्रदेशों में हिन्दी का आधिकाधिक प्रसार चाहते हैं, हिन्दी को लोकप्रिय बनाकर सही मायने में राष्ट्रभाषा का दर्जा दिलाना चाहते हैं , तो ऐसे मित्रों की हिन्दी में आपको उनकी मातृभाषा या लोक भाषा के शब्दों को, बिना मजाक उड़ाए, समझना भी चाहिए या समझने की कोशिश भी करनी चाहिए। भले ही अस्थाई तौर पर हमें थोड़ी अंग्रेजी का सहारा क्यों न लेना पड़े। ‘मैं जेवण(खाना खाकर) करके आया हूंँ ‘, तुम (‘आप’ के स्थान पर) जॉल खायेगा क्या ? (बांग्ला में ‘खाना’ क्रिया वाकई में संस्कृत के ‘ग्रहण करना’ के रूप में है) वगैरह को यथासंभव निर्लिप्त भाव से समझने और ग्रहण करने का प्रयत्न करें। द्रविड़ भाषा भाषियों को हिन्दी बोलने में स्वाभाविक रूप से अधिक परेशानी आती है, क्योंकि उनको अलग लिपि, शब्द विन्यास और उच्चारण की आदत होती है।’मई बाहर्र इरुट्टु (अंधेरा) में तनियान(अकेला)
आय्याजी !!’ कहने पर किसी तमिल मित्र का मजाक उड़ाने की बजाए, अगर उसे आराम से बैठा कर एक गिलास पानी पिलाकर, बाद में हिंदी-अंग्रेजी के मिश्रण में उससे ‘इरुट्टु’ और ‘तनियान’ का मतलब समझ लें और साथ ही उसे भी सही हिन्दी शब्द बता दें तो इससे दो नहीं तीन लाभ होंगे। पहले दो लाभ तो यह कि आप तमिल शब्द सीख जाएंगे और उन्हें हिन्दी शब्दों का ज्ञान हो जाएगा। यह दो तो मामूली बातें हैं। खास और सबसे बड़ी बात तो यह होगी के आपके तमिल मित्र के मन में आपके प्रति जो विश्वास उत्पन्न होगा , वह बड़ा मूल्यवान होगा और यही चीज ‘आपकी’ हिन्दी को बहुत दूर तक ले जाएगा। इसीलिए आपको याद होगा कि पिछले दिनों सोशल मीडिया पर, एक तमिल भाषाभाषी समाचार वाचिका को हिन्दी में मौसम का हाल सुनाते हुए, मजाक के तौर पर प्रस्तुत किया गया था। इसीलिए केवल मैंने ही कहा था कि नहीं ठीक है भाई, चलने दो, इनका मजाक मत बनाओ। ‘आपकी हिन्दी’ इसी तरह ‘उनकी हिन्दी’ भी हो जाएगी।
बस इतनी सी बात है। आप में से बहुतों ने पतंग जरूर उड़ाई होगी। पतंगबाजी में एक के बजाय अगर दो जन हों तो बेहतर होता है। एक,जो थोड़ा उस्ताद होता है, वह डोर थामता है और जो थोड़ा छोटा होता है,वह परेती (चकरी या चरखी) पकड़ता है। भैये,यह कला बिल्कुल हिन्दी सीखने जैसी है। कभी झटके देकर (इसे खास पतंगबाजों की भाषा में ठुमके देना कहते हैं, खैर यह बातें और दिलकश हैं,तो उनकी बात कभी और करेंगे) पतंग आसमान में चढ़ानी पड़ती है। फिर ढील देकर सद्दी हाथ में आने तक उसे ऊपर चढ़ाते हैं।कभी कभी पेंच भी हो जाते हैं।इस सब में जो परेती संभालता है,उस गरीब की खासी मुसीबत रहती है।कभी लपेटो, नहीं मांझा उलझ न जाय, और पेंच लड जाय तो ढील तो देनी ही पडती है,वह भी बडी तेजी से।वही बात है यहां पर भी।अगर आपको हिंदी की पतंग को ऊपर, बहुत ऊपर ले जाना है, तो कानून के पेंच मत लड़ाइये, कानून के मांझे से दोनों पक्षों की उंगलियां लहूलुहान हो जाती हैं। यह बात हम १९५८ और १९६७ के हिन्दी विरोधी आंदोलनों में देख चुके हैं। जबकि आश्चर्यजनक रूप से आधे से अधिक तमिल और करीब एक तिहाई केरलीय लोग, तब भी हिन्दी समझ लेते थे। अब तो यह संख्या और भी बढ़ गई है। प्रेम से हिन्दी की पतंग को ढील दीजिए, ताकि सद्दी में भी इतनी ऊपर चढ़ सकती है,कि पूरे भारत में नजर आ जाए।
सारी दुनिया भुला के रूह को मेरे संग कर दो,
हिन्दी के धागे से बंध जाओ, खुद को पतंग कर दो।
**************************

हमारी-आपकी हिन्दी का एक दिन

सुस्वागतम् हिन्दी तुम्हारा,अपने ही घर में स्वीकारो,
‘हिन्दी दिन’ पर अपने ही घर में, अपना ही सत्कार करो।
दुनिया भर में जो भाषाएं, सर्वाधिक बोली जातीं हैं,
उन तीनों में तुम शामिल हो, फिर भी तुम्हें लाज आती है?
कुछ ही सपूत जानते कारण,क्यों कर आज तुम्हारा दिन है,
बाकी सभी भेड़चाल में हैं चिल्लाते – हिंदी दिन है, हिंदी दिन है।
उन्निस सौ उंचालिस में जब चौदह सितंबर आया था,
संविधान रचयिताओं ने,’तब उसे ‘हिंदी दिन’ बतलाया था।
राजभाषा भी चुना गया था,ऐ प्यारी हिन्दी तुमको उस दिन,
पर तेरी ईर्षालू बहनों ने ही, बदला लिया बड़ा गिन गिन।
बस बांटो और राज करो,जिस अंग्रेजी ने सिखलाया था,
देसी अंग्रेजों ने फिर अपनी भाषा को,तेरे समकक्ष बिठाया था।
तुलसी, केशव, पंत, निराला भी नि:संशय कलपे होंगे,
‘हिन्दी’ को घर में ही ‘दिवस’ चाहिये,यह सुनकर तड़पें होंगे।
अपने घर में स्वयं पाहुनी,जाओ तुम आनन्द करो,
आओ ‘हिन्दी दिवस’ मनाओ,फिर अंग्रेजी में टॉक करो!!
##################

गणेश जी की तस्वीर और उस पर एक कविता प्यारी सी

दो तीन दिन पहले एक अजीब वाकया हुआ। वॉट्सएप पर श्री गणेशजी का यह प्यारा सा चित्र साझा किया गया था। उस पर यह कहा गया कि इस चित्र पर कुछ सुन्दर सी पंक्तियां लिख भेजिए।बस फिर क्या था, सिद्धहस्त कवियों ने धड़ाधड़ कविताओं का ढेर भेजना शुरू कर दिया। यह क्या बात हुई भला, एक गणु,भौत सारे फूल,जय जय । बस और क्या ? इस पर कोई कविता लिखने की बात जमीं तो नहीं। खैर, बात जमी नहीं यह तो एक बहाना था। कुछ लिखना तो दूर, कविता बनाना तो बिल्कुल ही आसमान से तारे तोड़कर लाने जैसी बात थी। मतलब ‘नाच न आवे ……’वाला बहाना ! क्यों कि पिछले पचास साल से कविता का ‘क’ नहीं लिखा था। (पहले दो चार,कार्टून छाप लाइनें लिखीं थीं, गणेश जी की कसम झूठ नहीं बोलूंगा !) यह तो वैसी बात हुई कि,

“उम्र तो सारी कटी इश्क़-ए-बुताँ में ‘मोमिन’ ; आख़िरी वक़्त में क्या ख़ाक मुसलमाँ होंगे।”

हां,पर बात चैलेंज की थी ; क्यों कि पूछने वाली मोहतरमा हमारे लिए बेहद खास हैं। सो दोस्तों, रख दिया गिलोटिन के नीचे सिर ! आप खुद ही देख लीजिए, और फैसला भी कर दीजिए।

##########श्री##########

##########श्री############

एक सुघड़ सा चित्र दिखाया,
उस सुभगे के ने मुझको आज।
वह तो थे प्रत्यक्ष गजानन
सुमुख, कुमुददल का था साज।

पर पण’ रखा कठिन था उसका ,
वर्णन करो छंदमय,छवि का
अथवा तुम गुण-गद्य चितेरो,
या फिर तुम चुपके ‘चीं’ बोलो!

हे प्रिय,ना मैं कवि,ना लेखक,
तुम मुझको, यूं व्यर्थ न घेरो।
प्रभु,तुम वेदव्यास बन जाओ,
खुद ही अपनी स्तुति लिखवाओ।
अर्ध शतक के बाद छंद को,
तब मैं दे पाऊं , न्याय,विवेक।

(पण : शर्त)

*********श्री गणेश*******

तुम शैफाली श्वेत सुगन्धित,
इन्द्रजाल सा लेकर विन्यास।
संख्याबल, मादक सुगन्ध से,
अलि ! क्या जीतोगी गणराज ?

मैं तो एक अकेला गुड़हल,
ना सुगंध है , ना संख्या बल।
दिया रंग,आकृति का साज,
प्रभु ने मुझे स्वयं का आज।

एक सूंड़ भी अपने जैसी,
दो वैसे ही विस्तर्ण कर्ण हैं,
मैं खुश हूं ,मैं जहां पड़ा हूं,
नहीं शीर्ष की चाह मुझे है।

पारिजात, तुम स्वर्ग पुष्प हो,
लक्ष्मी मां के भी तुम प्रिय हो।
फिर भी ‘हर’-सिंगार नाम धर,
तुम किस किस को छलते हो।

मेरी विनय सुनो यदि चाहो,
श्रीगणेश को ना ललचाओ।
सारे पुष्प बनाए उसने,
स्पर्धा यह किस काम की
हे गणराज, कृपा तुम रखना,
सबके शुभ कल्याण की।

∆∆∆∆∆∆∆∆∆श्री∆∆∆∆∆∆∆∆∆

*************************

चन्द्रयान २, आज सात सेप्टेंबर

नमस्कार 🙏
काल रात्री चार वाजेपर्यंत अतिशय उत्कंठेने आपल्या वैज्ञानिकांच्या यशाची कामना करीत, टीव्ही वर चंद्रयान 2 च्या विक्रम लैंडर च्या सुखरूप उतरण्याची वाट पाहत होतो. काल रात्रीच श्री कोष्टीजीं च्या चंद्रयान विषयी ब्लॉगवर शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. कल्पना करा त्या वैज्ञानिकांच्या मनस्थिती ची , ज्यांनी अनेक जागवलेल्या रात्रींच्या अविश्रांत श्रमाचे, आणि आपल्या देशासाठी जिवाचे रान केलेल्या त्यांच्या अडीच वर्ष मेहनतीचे. अगदी थोडक्या दोन किलोमीटर अंतरावर पोहोचून हातचे यश (कदाचित ….. लक्षात ठेवा की विक्रम बरोबर आपले फक्त कम्युनिकेशन तुटले आहे, याचा अर्थ असा कि मिशन सर्वस्वी अपयशी ठरले असे मी तरी अजून समजत नाही.) थोडक्यात हुकले असावे, याचे मलाच नव्हे तर आपण सर्वांना व सर्व देशाला थोडे नैराश्य वाटले. तरीही किंचितसे विज्ञान कळत असल्यामुळे, आपण हे समजू शकतो कि लहान-सहान प्रयोग करण्यात सुद्धा यशाची 100% हमी नसते.

येथे तर लक्षावधी कंपोनेण्ट्स ने तयार केलेल्या चंद्रयान 2 मध्ये, कोट्यावधी प्रयोगांचा एकत्र समावेश होता, त्यामध्ये कदाचित एक चूक झाली असावी, तर त्या करिता राष्ट्रीय अस्मितेची मान खाली घालवण्याची काहीच गरज नाही. उलट आपण सर्वांना आपल्या वैज्ञानिकांच्या अतिशय अभिमान आहे, आणि असलाच पाहिजे. लक्षात ठेवा हा आपला पहिला प्रयत्न होता. (चंद्रयान 1 हे फक्त अॉर्बिटर लैंडर होते, ते चंद्रयान 2 प्रमाणे एक कंपोझिट अॉर्बिटर लैंडर+रोवर मिशन नव्हते.) आणि आपण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की यापूर्वी ज्या पांच देशांनी असे प्रयत्न केले त्यात यशाची टक्केवारी फक्त ५९% टक्के आहे.
आपल्या वैज्ञानिकांना त्यातही अडथळे बरेच होते, लँडिंग साईट तयार करण्या पासून अगदी रॉसकॉसमॉस (रशियन स्पेस एजन्सी) ने वेळेस मदतीचा हात मागे ओढून घेण्या पर्यंत. तशातही चंद्रमा वर पृथ्वीच्या कक्षेतून कमीत कमी अंतराचा कोण साधून, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे आणि तिथे उतरणे,या करता जी नेमकी संक्षिप्त वेळ (विंडो) लागते ती दोनदा तांत्रिक बिघाडां मुळे हुकल्याने, आपल्या वैज्ञानिकांनी मनाचे धैर्य व स्थैर्य अजिबात ढळू न देता, जो प्रयत्न केला , तो खरोखर स्पृहणीय आहे. म्हणून,आपल्या सर्व वैज्ञानिकांच्या ह्या अविश्रांत मेहनतीचे, धैर्याचे तितक्याच कौतुकाने मी तरी अभिनंदन करतो.

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत |
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यता दुर्गमं
पथकस्तत्कवयो वदन्ति ||

[परत उठा, जागे व्हा, आणि अधिक ज्ञान मिळवा. ज्ञान आणि ध्येय मिळावं अशी इच्छा असणाऱ्या लोकांचा मार्ग धारदार सुरीवरून चालण्याएवढा कठीण असतो.
ध्येय ठरलेले असेल तर मार्ग कठीण असला तरी तो चालण्याचे बळ मिळतेच. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतेच ज्ञान मिळणे अशक्य!]
जय हिंद.

गणपती

गणपती

जैसे ही जन्माष्टमी के उत्सव की धूम समाप्त होती है, वैसे ही भारत के लोग गणेश जी के आगमन की तैयारी शुरू कर देते हैैं।उत्तर और पूर्वी भारत की तुलना में महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ,मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और आंध्र प्रदेश गणेश चौथ से लेकर अनंत चौदस तक गणपति उत्सव अधिक उत्साह के साथ मनाया जाता है। गणेशजी के बारे में , विशेषकर गणेश मूर्ति की स्थापना, आकार, निर्माण के पदार्थ, पूजा, विसर्जन आदि को लेकर , गणपति उत्सव के पास आते ही, फेसबुक, व्हाट्सएप से लेकर अखबारों पत्र-पत्रिकाओं में इतनी बातें आने लगती हैं, कि सच क्या और झूठ क्या इसी में सर चकराने लगता है। तो मेरा निवेदन है, कि मेरी बातें कभी फुर्सत में पढ़ लीजिए, नहीं तो अनावश्यक कन्फ्यूजन और बढ़ जावेगा। गणेश जी के विषय में यदि आपको अधिकारीक रूप से जानना हो तो गणेश पुराण के भारतीय भाषाओं में अधिकारिक अनुवाद उपलब्ध है। इसके अलावा ब्रह्मपुराण जो कि गणेश पुराण से संभवत: कुछ और पुराना है, उसके संदर्भ देखना भी उचित रहेगा। इसके लिए संस्कृत का ज्ञाता होने की आवश्यकता नहीं है। धार्मिक विषयों पर बहुत संभाल के लिखने की आवश्यकता है, इसलिए मैंने इतनी विस्तृत जानकारी लिखने की कोशिश की है। कारण बहुत स्पष्ट है, कि आजकल नवमत वादियों और पुरातन परंपरा में विश्वास रखने वालों के बीच इस विषय पर गणेश महाराज के स्वरूप आदि के बारे में बड़ी विद्वत्तापूर्ण शास्त्रार्थ छिड़ा हुआ है।

गणपति क्यो बैठाते हैं :

वैसे सामान्यत: गणेश जन्म की और उसके पश्चात शिव जी के द्वारा उन्हें वर्तमान स्वरूप देने की विभिन्न कथाएं प्रचलित हैं। और अधिकांश लोग यही मानते हैं, कि गणेश के जन्मदिवस के कारण ही यह उत्सव मनाया जाता है। पर उनको पानी में क्यों विसर्जन करते हैं,दस या ग्यारह दिन ही क्यों ….. इत्यादि कई बातों के जवाब इस कथा से नहीं मिलते। फिर हम सभी, हर साल गणपती की स्थापना करते हैं, साधारण भाषा में गणपति को बैठाते हैं। लेकिन ऐसा करने के पीछे एक अलग पौराणिक कथा है।
हमारे लगभग सभी प्रमुख धर्मग्रंथों के अनुसार, महर्षि वेद व्यास ने महाभारत की रचना की थी। लेकिन लिखना उनके वश का नहीं था।अतः उन्होंने श्री गणेश जी की आराधना की और गणपति जी से महाभारत लिखने की प्रार्थना की।पर इसके साथ ही उन्होंने व्यास जी के समक्ष एक विचित्र शर्त रख दी, उन्होंने कहा की ‘हे महाज्ञानी आचार्य, मैं पूरे ग्रंथ को पूरा ‘आद्यांत और अविश्रांत’ (पूरा ग्रंथ एक साथ और बिना रुके) तभी वह अक्षुण्ण उपनिषदों और वेदों के समकक्ष माना जावेगा।’ उनका तात्पर्य था के महर्षि वेदव्यास और संपूर्ण कथा बिना रुके कहेंगे और गणेश जी उसे अविश्रांत-अर्थात बिना रुके-लिखेंगे। शर्त कठिन तो थी पर वेदव्यास जी जानते थे कि बिना अथर्व कृपा के यह कार्य असंभव है। उन्होंने सहमति दे दी तो गणपती जी ने भी हामी भर दी। इस पर , भाद्रपद शुक्ल चतुर्थी को व्यास जी ने, गणेश जी का आवाहन करके, सर्वप्रथम उनका अभिषेक सहित स्वागत करके उनकी अष्टांग पूजा की।
अब दिन-रात लेखन कार्य प्रारम्भ हुआ। यह कार्य दस दिन चलना था। इस कारण गणेश जी को थकान तो होनी ही थी, लेकिन उन्हें दिन में पानी पीना भी वर्जित था।अतः गणपती जी के शरीर का तापमान बढ़े नहीं, इस हेतु से वेदव्यास ने उनके शरीर पर चिकनी मिट्टी को गीला कर उसका लेप किया। (चिकनी मिट्टी मेंं अधिक पानी धारण करने की शक्ति होती है) इसी क्रम में ग्यारह दिन बीत गए और मिट्टी का लेप सूखने पर गणेश जी के शरीर में अकड़न आ गई, इसी कारण गणेश जी किसी मृदमूर्ति (पृथ्वी के तत्व अर्थात मिट्टी से बने हुए- ‘पार्थिव‘) जैसे दिखाई देने लग गए । इसलिए उनका एक नाम पर्थिव गणेश भी पड़ा। और गणेश उत्सव के दौरान जो मूर्ति हम स्थापित करते हैं उसे पार्थिव गणेश कहा जाता है।
महाभारत का लेखन कार्य ग्यारह दिनों तक चला।अनंत चतुर्दशी को लेखन कार्य संपन्न हुआ।
वेदव्यासजी ने देखा कि , गणपती का शारीरिक तापमान फिर भी बहुत बढ़ा हुआ है और उनके शरीर पर लेप की गई मिट्टी सूखकर झड़ रही है, तो वेदव्यास ने उन्हें और शीतलता प्रदान करने केे हेतु से, उनका यथायोग्य पूजन अर्चन और अनुष्ठान एवं दक्षिणा अर्पित कर, विदाई की पूजा के पश्चात पानी में डाल कर विदा किया।(इसे ही विसर्जन कहा जाता है) कहा जाता है कि गणेश जी के शरीर से जो चिकनी मिट्टी नीचे झरकर गिरी थी, महर्षि वेदव्यास ने अपने कुछ पूर्व शिष्यों में प्रसाद के रूप में बांट दी। जब उन शिष्यों ने मिट्टी अपने घरों में बिखेर दी, तो वे आजन्म सुख समृद्धि ऐश्वर्य से पूर्ण आयुष्य के भागी हुए। संभवत इसी से प्रथा चल पड़ी कि जब गणेश मूर्ति को अनंत चौदस के दिन नदी अथवा तालाब विसर्जित करते हैं तो उसी पटे पर हम उस नदी, तालाब अथवा कुंड की कुछ रेत या मिट्टी उठाकर लाते हैं और घर भर में बिखेर देते हैं।
खैर जब इधर लेखन कार्य जारी था तब मोदक प्रिय गणेश निराहार तो रह नहीं सकते थे । इसलिए इन दस दिनों में वेदव्यास ने गणेश जी को खाने के लिए मेवों से युक्त अनेक प्रकार के मोदक, मिष्ठान और फल इत्यादि विभिन्न पदार्थ अर्पित किए। इन्हें नैवेद्यम कहा जाता है। गणेश जी के लेखन कार्य में व्यस्त होने के कारण दाहिने हाथ सेे लेखनबद्ध होते थे, इसलिए उन्होंने एकभुक्त होनेे का (दिन में केवल एक बार भोजन ग्रहण करने का व्रत) व्रत लिया हुआ था। ऐसी किंवदंती है के सूर्यास्त के पश्चात वे बाएं हाथ से लिखने लग जातेे और दाहिने हाथ से प्रसाद ग्रहण करते थे। संभवतः इसी आधार पर कलियुग में इन दस दिनों में गणपति का सांध्यपूजन और नैवेद्य प्रसाद का विशेष महत्त्व है। किंतु आधुनिक काल में जो गणेशोत्सव सार्वजनिक तौर पर मनाया जाने लगा तब दोनों वक्त आरती, पूजन, प्रसाद, भंडारे आदि के आडंबर प्रारंभ हो गए।
स्थान के अनुसार किस प्रकार की गणेश जी की मूर्ति को स्थापित करना चाहिए।
# गणेश जी कैसे आपके घर का वास्तुदोषों को सुधार सकते हैं यह जान लेना भी योग्य होगा।

#सुख, पारिवारिक शांति और अध्यात्म की चाह रखने वालों को सफेद रंग के विनायक की मूर्ति लानी चाहिए।साथ ही, घर में गणपतिजी एक स्थाई चित्र भी पूर्व या पश्चिमामिमुखी लगाना चाहिए।

#सर्व मंगल, स्वास्थ्य एवं ऐश्वर्य की कामना करने वालों के लिए सिंदूरी रंग के गणपति की आराधना अनुकूल रहती है। प्राय: हमारे घर में स्थापना के लिए इसी प्रकार की मूर्ति लाई जाती है। – घर में पूजा के लिए गणेश जी की अर्धशयन या बैठी मुद्रा में हो तो अधिक शुभ होती है। घर में स्थापित की जाने वाली मूर्ति केवल मिट्टी बनी हुई होनी चाहिए। जहां तक संभव हो सके पर्यावरण संरक्षण की दृष्टि से अपने भरोसे के मूर्तिकार से मूर्ति खरीदें जो तेल में बने हुए प्राकृतिक रंग इस्तेमाल करता हो। प्लास्टर ऑफ पेरिस (POP) , चीनी मिट्टी, सीमेंट,पेपरमेशी, मेवों, फलों अथवा प्लास्टिक क्ले की बनी हुई मूर्तियां न तो शास्त्रीय, और न पर्यावरण की दृष्टि से मान्य हैं। गणेश पुराण के अनुसार किसी गृहस्थ के घर में (तात्पर्य हमारे सामान्य घरों से है) गृह स्वामी के ग्यारह अंगुल के तुल्य (लगभग एक बीता ऊंची) से अधिक बड़ी प्रतिमा स्थापित नहीं करनी चाहिए।(एकादशांगुल मृद्मूर्तिर स्थापनीयं–गणेश पुराण)

# आजकल हम धार्मिक श्रद्धा के प्रति, मन से उतने कटिबद्ध नहीं होते, जितने की प्रचार माध्यमों और सोशल मीडिया से प्राप्त जानकारी के प्रति दिखावा करने के लिए। इसलिए विडंबना यह है कि घर में स्थापित गणेश जी की पूजा एक बार छूट जाए, उसके शास्त्रीय नाप-जोख, स्वरूप का वर्णन हम बहुत सूक्ष्मता से करने लग गए हैं। किंचित इसी श्रेणी में गणेश जी की सूंड का स्वरूप भी आजकल अधिक महत्वपूर्ण हो गई है। इसका धार्मिक और पौराणिक आधार तो है, पर आज से 20 साल पहले उसे इतना महत्व नहीं दिया जाता था जितना कि आज !! घर स्थापित करने के लिए, बाई तरफ सूंड घुमाए हुए गणेश जी विराजित करना चाहिए। बांये सूंड से हमारा तात्पर्य यह है कि सूंड का मध्य भाग अगर बांयी ओर मुड़ा हो, और सूंड का अंतिम हिस्सा अगर दाहिनी ओर भी मुड़ गया हो, तो भी ऐसी मूर्ति को बांयी सूंड वाली की मानी जावे। ऐसे गणपति चंद्र नाड़ी के गणपति होते हैं और चंद्र नाड़ी की विशेषता शीतलता प्रदान करना होती है। आध्यात्मिक दृष्टि से ऐसे गणपति का पूजन पुण्य संचय करने वाला होता है। बांयी सूंड वाले गणपति की पूजा अर्चना भी सामान्य विधि से की जाती है और यदि अनजाने में उसमें कोई त्रुटि हो भी जावे, तो तो भी कोई पातक नहीं लगता है, यदि पूजक, पूजा के पश्चात क्षमा प्रार्थना के मंत्र ‘आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनम्, पूजाम् चैSव न जानामि….’ पूजा के अंत में श्रद्धा पूर्वक कहे जावें।इसलिए घरों में आजकल के दिखावे के दौर में, गणेशोत्सव के दौरान स्थापित की जाने वाली मूर्ति इसी प्रकार ही होती है !! मंगल मूर्ति को मोदक और उनका वाहन मूषक अतिप्रिय है। इसलिए मूर्ति स्थापित करने से पहले ध्यान रखें कि मूर्ति या चित्र में मोदक या लड्डू और चूहा जरूर होना चाहिए। विशेषकर घर के पूजन में स्थापित की जाने वाली गणेश मूर्ति में गणेश को छोड़कर कोई अन्य देवता, प्राणी अथवा विचित्र वाहन मान्य नहीं है। इसलिए प्रथम पूज्य गणपति के उत्सव में माता पार्वती के गोद में बैठे हुए अथवा माता-पिता के सानिध्य में गणेश जी की मूर्ति, मोर, हाथी आदि प्राणियों पर आरूढ़ मूर्ति नहीं स्थापित करनी चाहिए।

# घर में स्थापित होने वाले गणेश, गणेश चतुर्थी के दिन प्रायः मध्यान्ह अथवा गोरज (संध्या) के मुहूर्त में स्थापित करते हैं। विसर्जन भी प्राय: अनंत चतुर्दशी के दिन सूर्यास्त के पूर्व किया जाता है। वैसे महाराष्ट्र में विभिन्न परंपराओं और कुलाचार के अनुसार डेढ़,तीन, पांच,सात दिनों के पश्चात भी गणेश जी का विसर्जन किया जाता है।यद्यपि घर के पूजन में सामान्य जनों से कुछ त्रुटियां हो जाती हैं, पर गणेश जी के दाहिने ओर स्वस्ति-घट और श्रीफल तथा बांई ओर दो बीड़े के पत्तों पर कुछ अक्षत चावल के ऊपर एक सुपाड़ी की स्थाणुर गणेश (स्थान देवता के रूप में अभिषेक आदि पूजन के लिए प्रतीक गणपति, जिनका विसर्जन नहीं होता) की विधिवत स्थापना अवश्य की जानी चाहिए। स्थापना के समय स्थाणुर और पार्थिव, दोनों ही गणेशों को ब्रह्मसूत्र (जनेऊ), बीड़ा, दक्षिणा, वस्त्र, फूल (यदि संभव हो तो प्रतिदिन लाल फूल, गणेश जी को अवश्य अर्पण करें, जो उनको अत्यंत प्रिय हैं।) , अक्षत के चावल, हरिद्रा कुमकुम, दूर्वा, तुलसी तथा गुलाल अर्पण करना न भूलें। अगर आप स्वयं गणेश जी की स्थापना कर सकते हैं, तो यह ध्यान रखें कि आपके पास स्थापना की पूजा का संपूर्ण क्रम उपलब्ध है। यदि नहीं तो स्थापना के लिए अनेक लोग पंडित जी को भी बुला कर यह कार्य करते हैं।
ग्यारह दिनों के इस उत्सव में प्रतिदिन प्रातः काल स्नान के पश्चात जब आप घर के देवताओं का पूजन करते हैं उसी समय गणेश जी का पूजन भी करें। प्रातः कालीन पूजा में गणपति अथर्वशीर्ष का पाठ कर उनका अभिषेक करना उत्तम है। सामान्यतः सुबह अन्य देवताओं के साथ श्री गणेश जी को नैवेद्य (भोग) प्रदान किया जाता है। किंतु सायंकालीन पूजा में, यथासंभव परिवार के समस्त सदस्य उपस्थित होकर आरती करें और गणेश जी को मिष्ठान्न का प्रसाद अर्पित किया जाए।

#दाएं (दक्षिण) हाथ की ओर घुमी हुई सूंड वाले (आपके बाएं हाथ की ओर सूंड घूमे हुए) गणपति की सूर्य नाड़ी मानी जाती है जो के प्रखरता का प्रतीक है। ऐसी तेजस्वी गणपति दक्षिण दिशा की ओर महकर मुख कर बैठाए जा सकते हैं, और ऐसा माना जाता है कि उनकी प्रखरता से दक्षिण दिशा का अधिपति यम भी भय खाता है। किंतु ऐसे गणेशजी हठी होते हैं और उनकी साधना-आराधना कठिन होती है। वे देर से भक्तों पर प्रसन्न होते हैं। और पूजा में त्रुटि रहने पर कुपित भी हो जाते हैं, इसलिए प्राय: तांत्रिक कार्यों के लिए ऐसी मूर्त्तियों का प्रयोग किया जाता है।

#अगर आपके कार्यस्थल पर गणेश जी की मूर्ति विराजित कर रहे हों, तो खड़े हुए गणेश जी की मूर्ति लगाएं। इससे कार्यस्थल पर स्फूर्ति और काम करने की उमंग हमेशा बनी रहती है। ऐसी मूर्तियां सवा हाथ (लगभग दो फुट) हो सकती हैं। यह नियम सार्वजनिक कार्यक्रमों में स्थापित की जाने वाली प्रतिमाओं के लिए भी लागू होता है।
यदि कला या अन्य शिक्षा के प्रयोजन से पूजन करना हो तो नृत्य गणेश की प्रतिमा का पूजन लाभकारी है।
#आजकल, दुर्भाग्य से गणेश बुद्धि शक्ति और समृद्धि के प्रतीक होने की बजाय, व्यवसायिकता और शान शौकत के प्रदर्शन का जरिया बन गए हैं। यह भारतीय समाज के लिए बड़े दु:ख की बात है। वास्तव में यह नई और पुरानी पीढ़ियों की धारणाओं का और नई, पुरानी परंपराओं के मिश्रण से उपजा हुआ घालमेल है।मजेदार बात यह है, कि परंपराओं के टकराव में एक दूसरे के विरोधी बातें बोली जाती हैं और कथनी की तुलना में करनी में अंतर आ जाता है। पुरानी पीढ़ी मिट्टी की परंपरागत मूर्तियों की पैरवी करती है, तो नई पीढ़ी नदियों और जल स्रोतों को प्रदूषित न करने की बात करती है। प्लास्टर ऑफ पेरिस की मूर्तियां और निर्माल्य (देवता के उतरे हुए हार और फूल) और सजावट के थर्मोकोल, प्लास्टिक की सामग्री और हानिकारक रंगों की वर्जना होती है। बात तो एक ही है, पर वास्तविकता के धरातल पर इसका कहीं पालन होता दिखाई नहीं पड़ता।
# दूसरी और वास्तविकता में बड़े-बड़े पंडाल सजते हैं, बीस से पचास फीट तक की, भारी तार के ढांचों और प्लास्टर की विशाल रंग बिरंगी गणेश मूर्तियां विराजमान होती हैं। जिनमें हानिकारक ऑयल पेंट, भारी धातुओं का, कैंसर कारक रंगों का इस्तेमाल होता है। थर्मोकोल के महल बनते हैं, रंगीन चमकदार प्लास्टिक के हार और झूमर लटकाए जाते हैं, चमकदार झालर के एलईडी बल्ब, सैकड़ों किलोवाट बिजली खर्चते हुए हुए मंडप सजते हैं। मुख्य मंडप के दोनों और तीन चार सौ मीटर सड़क पर रंग बिरंगी रोशनी की जाती है; और अपनी मंडप की ओर अधिकाधिक लोगों को आकर्षित करने के लिए सैकड़ों डेसीबेल आवाज उत्पन्न करने वाले बॉक्स और हॉर्न स्पीकर्स की दीवार खड़ी कर दी जाती है। ऐसे सार्वजनिक पांडालों में धार्मिक गीतों से अक्सर शुरुआत होती है और फिर धीरे धीरे फूहड़ और कभी कभी अश्लील रैप गानों तक नौबत पहुंच जाती है। इससे ध्वनि प्रदूषण तो होता ही है, साथ साथ वैचारिक प्रदूषण भी जन्म ले लेता है। आवाज की कर्कशता से वृद्ध लोगों, रोगियों और छोटे बच्चों को विशेष रूप से तकलीफ होती है। वृद्ध लोगों और दिल के मरीज इस से सर्वाधिक प्रभावित होते हैं। हाल में, मुंबई में किए गए एक सर्वेक्षण के माध्यम से यह ज्ञात हुआ है, कि सतत रूप से बहुत तीव्र ध्वनी के कारण, गणपति जी के पंडाल से 200 मीटर दूरी तक के रहवासियों की श्रवण शक्ति, स्थाई या अस्थाई रूप से 20% तक प्रभावित होती है। 30 से 40% घरों में नींद की कमी और रक्तचाप के बढ़ने से, चिड़चिड़ाहट, कौटुंबिक कलह बढ़ जाते हैं। यह सारी बातें मीडिया,शासन और सर्वाधिक तो सोशल मीडिया के उपदेशों के बाद भी बढ़ रही है, यह ही गहन चिंता का विषय है।
# जहां तक प्रतिमा के विसर्जन का प्रश्र्न है, पारंपरिक रूप से गणेश प्रतिमाओं को प्राकृतिक जल स्त्रोतों (नदी, तालाब या समुद्र) में विसर्जित किया जाता रहा है। आज भी पुराने लोगों का वही विश्वास कायम है; और कुछ कट्टर धर्म प्रचारक इसी बात में विश्वास करते हैं कि यह जल स्रोतों का प्रदूषण वगैरह बातें , आधुनिक विचारधारा वाले लोग धर्म भ्रष्ट करने के लिए कहते हैं। इस प्रकार के तर्क करने में हम तीन बातें भूल जाते हैं। पहले तो, मूर्तियों वाली बात, पूर्व काल से मिट्टी की मूर्तियों को छोड़कर अन्य कोई प्रावधान नहीं था, न प्लास्टर ऑफ पेरिस, न प्लास्टिक, न सीमेंट हॉट न प्लास्टिक करले। पहले निर्मल्य में केबल बासी फूल होते थे। दूसरे, मूर्तियों का आकार; इस बाबत भी धर्मशास्त्रों के अनुसार अब मूर्तियों के आकार का पालन नहीं करते हैं। तीसरी बात मूर्तियों की आकार के साथ साथ बढ़ती हुई संख्या। आज से पचास वर्ष पूर्व की तुलना में, मूर्तियों की संख्या बीस गुना से ज्यादा हो गई है। जबकि तुलनात्मक रूप से जलस्रोतों की संख्या पहले से काफी कम हो गई है। कई छोटी नदियां सूखने लगी हैं, अधिकांश तालाब पूर दिए गए हैं। जो बचे हैं उनमें भी जल की मात्रा कम हो गई है और प्रदूषण इतना अधिक कि विगत पचास साल में, भारत की लगभग चार गुना बढ़ी आबादी में से ९०% आबादी को शुद्ध पेयजल मिलना लगभग असंभव हो गया है।
कुल मिला कर,यह सारा धार्मिक भावनाओं,श्रद्धा, विश्वास के तुलना में धर्म को नयी धारणाओं , चमक-दमक और सुविधा के नजरिए से देखने की घालमेल का नतीज़ा है। कोई भी इन सारे उत्सवों के पीछे छिपी सौहार्द, सामाजिक मेलजोल और विनम्र श्रद्धा को पनपने का मौका ही नहीं देना चाहता। खेद के साथ कहना पड़ेगा कि उपरोक्त उत्क्रांतियों से गुजर कर हम पर्यावरण के साथ अपनी सांस्कृतिक धरोहर को खो बैठेंगे। हमें किसी मध्यम मार्ग के रास्ते को चुनना होगा, जिससे श्रेय और प्रेम दोनों की प्राप्ति हो सके।

– रवीन्द्र परांजपे।